शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

जेवण केल्यावर लगेच आंघोळ केल्याने काय होतं? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 9:37 AM

Bathing after meal : घरातील वयोवृद्ध नेहमीच हे सांगत असतात की, जेवण केल्यावर आंघोळ करू नये. पण ते असं का सांगतात हे अनेकांना माहीत नसतं.

Bathing after meal : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो. त्या ब्रश करणे, नैसर्गिक विधी, नाश्ता, जेवण, झोप या अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. पण अनेकांच्या काही चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडत असतं. अशाच एका चुकीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आंघोळ आणि जेवण या दोन गोष्टींचाही महत्वाचा संबंध आहे. अनेकांना नेहमीच असा प्रश्न पडत असतो की, जेवण केल्यावर आंघोळ करावी की नाही? घरातील वयोवृद्ध नेहमीच हे सांगत असतात की, जेवण केल्यावर आंघोळ करू नये. पण ते असं का सांगतात हे अनेकांना माहीत नसतं. तेच कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

आजकाल लोकांची लाइफस्टाईल खूप जास्त बदलली आहे. दैनंदिन गोष्टी करण्याच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. ना जेवणाची वेळ फिक्स आहे ना झोपण्याची. अर्थात याचा प्रभाव आपल्या एकंदर आरोग्यावर पडतो आहे. जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर रूटीन लाइफमध्ये संतुलन ठेवावं लागेल तेव्हा तुम्ही फिट आणि निरोगी राहू शकता. अशात जेवणानंतर आंघोळ करावी की नाही याबाबत आयुर्वेद काय सांगतं हे जाणून घेऊया...

आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर आंघोळ करणं योग्य की अयोग्य?

आयुर्वेदात आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहे. वर्षानुवर्षे आयुर्वेदातील गोष्टींचा वापर करून अनेक आजारांवर उपचार केले जातात. रोजच्या गोष्टींबाबतही यात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आयुर्वेदानुसार, कोणतंही काम करण्यासाठी एक ठराविक वेळ असतो. यात बदल केल्याने शरीराचं नुकसान होऊ शकतं. 

जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये. अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अ‍ॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.

मेडिकल सायन्स काय सांगतं?

आयुर्वेदासोबत मेडिकल सायन्स याबाबत सांगतं की, जेवण केल्यावर आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होतं आणि ब्लड सर्कुलेशन डायव्हर्ट होतं. याचा परिणाम असा होतो की, जे रक्त डायडेशनमध्ये मदत करणार असतं, ते त्वचेकडे तापमान मेंटेन करण्यासाठी फ्लो होऊ लागतं.

जेवण केल्यावर किती वेळाने करावी आंघोळ?

एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यावर आंघोळ करणं नुकसानकारक ठरतं. याने अ‍ॅसिडिटी, उलटी अशा समस्या होतात. इतकंच नाही तर तुमचा लठ्ठपणाही वाढू शकतो. नियमानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला फ्रेश वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याचे सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य