शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

Diabetes मधुमेहाबद्दल आहेत 'या' अफवा...तुम्हीही कधीतरी फसले असणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 6:29 PM

अजुनही अनेकांना मधुमेहाबद्दल पूर्ण माहिती नाही. इकडचे तिकडचे ऐकून आपण काही गोष्टी खऱ्या मानतो, नको ते उपाय करतो आणि भलतंच होऊन बसतं.

Diabetes गेल्या काही काळापासून मधुमेहाचे प्रमाण बरेच वाढले आहे. अगदी तरुण वयातही मधुमेहाचे निदान होत आहे. जवळपास प्रत्येक दुसऱ्या गरात मधुमेहाचे रुग्ण आहेत. याला अनेक कारणे असु शकतात. मधुमेह हा आनुवंशिक असु शकतो मात्र नेहमीच असे होत नाही. बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, वाढते वजन हे देखील कारणीभुत ठरते. 

अजुनही अनेकांना मधुमेहाबद्दल पूर्ण माहिती नाही. इकडचे तिकडचे ऐकून आपण काही गोष्टी खऱ्या मानतो, नको ते उपाय करतो आणि भलतंच होऊन बसतं. बघुया मधुमेहाबाबत कोणती चुकीची माहिती पसरली आहे ज्यावर तुम्हीही कधीतरी विश्वास ठेवलाच असेल.

कुटुंबात कोणाला मधुमेह नाही तर धोका नाही

हे खरे आहे की मधुमेह बऱ्याचदा आनुवंशिक असतो. आई वडील, भाऊ बहिण यांच्यापैकी कोणाला मधुमेह असेल तर तुम्हालाही धोका अधिक असतो. मात्र जर कुटुंबात कोणालाही मधुमेह नसेल तर तुम्हालाही होणार नाही हे चुकीचे आहे. स्थुलता, अतिप्रमाणात गोड पदार्थ खाणे, शारिरीक कार्य कमी असणे यामुळे तुम्हाला मधुमेह होऊ शकतो.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी भात, बटाटा खाऊ नये

मधुमेहासंदर्भात अनेक पथ्य आहेत मात्र ते सगळेच खरे नाहीत. भात आणि बटाटा यांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते म्हणून ते अजिबात खाऊ नये. मात्र या गोष्टी १०० टक्के वर्ज्य नाहीत. कार्बोहायड्रेट शरीरात ऊर्जा निर्माण करतात. ते नसेल तर थकवा जाणवू शकतो. त्यामुळे कार्बोहायड्रेटचे नियंत्रित सेवन करु शकता.

साखरेचे प्रमाण योग्य झाल्यानंतर मधुमेहाचे औषधे घेण्याची गरज नाही

मधुमेहाचे अनेक रुग्ण ही चुक करतात. साखर कंट्रोल मध्ये आल्यानंतर स्वत:च गोळ्या, इन्सुलिन घेणे बंद करतात. डॉक्टर या सवयीला खुपच गंभीर समजतात. मधुमेह पूर्ण बरा होत नाही, गोळ्यांनीच तो नियंत्रणात राहतो. अशावेळी साखरेचे प्रमाण अचानक झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. काही अवयव निकामी देखील होऊ शकतात. डॉक्टरांना न सांगता औषधे बंद करु नये.

मधुमेह केवळ पचन आणि रक्ताची समस्या आहे

पचनक्रियेत होणाऱ्या त्रासामुळे मधुमेह होतो रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामध्ये डोळे, किडनी, यकृत यांना धोका असतो. त्यामुळे हे केवळ एखाद्या अवयवापुरते मर्यादित राहत नाही तर हळूहळू इतर अवयवांनाही धोका असतो. म्हणून मधुमेहाचे उपचार बंद करु नये.

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स