शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आंघोळ करतांना तुम्ही या चुका करता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 11:00 IST

आंघोळ करताना आपण अशा काही चुका करतो, ज्या वेळीच टाळणे गरजेचे आहे. कारण याचा परिणाम तुमच्या आरोग्यासोबतच सौंदर्यावरही होतो.

शरिर स्वच्छतेसाठी आपण दररोज आंघोळ करतो. आंघोळीने त्वचेवरचा मळ, मृत पेशी निघून जातात. त्यामुळे आपण दिवसभर आपण फ्रेश असतो. पण आंघोळ करताना आपण अशा काही चुका करतो, ज्या वेळीच टाळणे गरजेचे आहे. कारण याचा परिणाम तुमच्या आरोग्यासोबतच सौंदर्यावरही होतो.

गरम पाण्याची आंघोळ

आंघोळीसाठी गरमागरम पाणी घेतले तरच मनसोक्त आंघोळ होते, अशी काहींची धारणा असते. जी अत्यंत चुकीची आहे.  आंघोळीसाठी गरम पाण्याच्या वापराने त्वचा कोरडी होते. यामुळे शरीराला खाज सुटण्याची शक्यता असते. पण अंघोळीसाठी गरम पाण्याच्या वापराने त्यांच्या शरिरातील आवश्यक ऑईल नष्ट होतं. 

शॉवरखाली जास्त वेळ

आंघोळ करताना शॉवरखाली जास्त वेळ घालविणे हा अनेकांसाठी आवडीचा विषय आहे. पण याचे अपाय तुम्हाला होऊ शकतात. ३० मिनिटाहून अधिक काळ तुम्ही पाण्यात असाल तर तुमच्या त्वचेचा ओलावा नष्ट होतो. तेव्हा जर तुम्ही शॉवरखाली अंघोळ करत असाल, तर जास्तीत जास्त 10 मिनिटांचाच अवधी आंघोळीसाठी वापरावा.

सुगंधी साबणाचा

प्रत्येकजण स्वत:च्या आवडीने सुगंधी साबण वापरत असतो. बाजारात अनेक सुगंधी साबण ग्राहकांना भुरळ घालत असतात. पण आंघोळीसाठी सुगंधी साबणाच्या वापरानेही त्वचा कोरडी होते. त्यामुळे आंघोळीसाठी एशेंशियल ऑईल युक्त साबण वापरल्यास त्वचेसाठी चांगले असते.

आंघोळीचा ब्रश

आंघोळीसाठी ब्रशचचा वापर करणे केव्हाही चांगलेच पण तो जुना झाल्यास बदलणे महत्त्वाचे असते. कारण, जुन्या ब्रशच्या वापरानं तुमच्या त्वचेला इजा पोहचू शकते. त्यामुळे जितके जुने बॉडी पफ किंवा ब्रश असेल, तितकाच शरिरावर किटाणू जमण्याची शक्यता जास्त असते.

ताकदीने अंग कोरडं करणे

अकनेकजण आंघोळ झाल्यानंतर टॉवेल घेऊन जोरजोरात घासून घातून अंग पुसतात. काही लोक तर विचित्र आवाजही काढतात. अशात जर टॉवेल कोरडा असेल तर त्यामुळे तुमच्या स्कीनला इजा होण्याची शक्यता जास्त असते. सुरुवातीला याचं काही वाटणार नाही, पण काही काळाने याचा त्रास तुम्हाला जाणवायला लागेल. त्यामुळे शक्य झाल्यास सॉफ्ट टॉवेल वापरा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य