शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

Diet Plan : चहाबरोबर खारी, रक्तातील साखर होईल भारी; सकाळी मैदा खाणे हानीकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 9:31 AM

बऱ्याच मुलांना बिस्किटचा संपूर्ण पुडाच लागतो. काही मुले टोस्टवर धडाका लावतात....

पुणे : सकाळी सगळे आवरून झाल्यावर पहिल्या चहाबरोबर खारी, टोस्ट लागतातच. काही नाही तर किमान बिस्किट तरी हवेच. हे सगळे खाण्यासाठी फारच छान लागते; पण ते रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरते. ज्यांना त्रास आहे तो वाढू शकतो तर ज्यांना नाही त्यांना तो सुरू होऊ शकतो.

सगळीकडेच चहा- खारी, बिस्किटे

सर्वसामान्यांपासून ते धनिकांपर्यंत बहुतेकांच्या घरी सकाळच्या चहाची सुरुवात ही त्याच्याबरोबर काहीतरी खायला घेऊनच केली जाते. त्यातही टोस्ट, खारी, बिस्किट हे पदार्थ तर असतातच. लहान मुले तर सकाळी शाळेत जाताना खाण्याची सुरुवातच यापासून करतात. पालकच त्यासाठी आग्रही असतात. बऱ्याच मुलांना बिस्किटचा संपूर्ण पुडाच लागतो. काही मुले टोस्टवर धडाका लावतात तर वसाहतीमधील मुलांंना खारी खाल्याशिवाय होतच नाही.

का नकोत हे पदार्थ?

हे सर्व पदार्थ मैद्यापासून तयार होतात. त्यात पोषणमुल्य तर नाहीतच पण शरीरात आधीपासून असलेल्या योग्य प्रथिनांचीही ते हानी करतात. शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण ते वाढवतात. असेच खाण्याची सवय ठेवली तर शरीरालाही त्याचीच सवय होते. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. ती वाढली की आपोआपच रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. हे चक्रच आहे. खाण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर या सगळ्याची परिणिती अखेर दवाखान्यात दाखल होण्यातच होते.

मग खावे तरी काय?

आहारतज्ज्ञांच्या मते सकाळी सर्वप्रथम आपण जे काही खातो ते शरीराला उपयुक्त घटक ज्यात असतील तेच असायला हवे. कारण, यावेळी खालेल्या पदार्थांचे चांगले पचन होते. मैद्याचे पदार्थ खाल्ले तर त्याचे पचन होईल. मात्र, त्यापासून शरीराला आवश्यक ते घटक मिळणारच नाहीत. त्याचबरोबर नंतरचा शरीराला आवश्यक असणारा नाश्ता करता येणार नाही. कारण, पोट भरलेले असते. त्यामुळे शक्यतो गव्हाच्या पिठापासून तयार केलेला खाकरा किंवा त्यासारखे पदार्थ यावेळी खायला हवेत.

मैद्याच्या पदार्थांमुळे शुगर वाढते, ती अनियंत्रीत होते व वाढलेल्या शुगरमुळे रक्तदाबाचाही त्रास होतो. लहान मुलांसाठी तर हे सर्वात धोकादायक खाणे आहे. कारण, मुलांना त्याची सवय होते व नंतर मग दुसरे पौष्टिक खाणे त्यांच्याकडून होतच नाही. त्यामुळे खारी, टोस्ट असे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत.

- सुप्रिती दीक्षित, आहारतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य