शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

वजन कमी करायचं असेल तर पाणी पिण्याची 'ही' खास पद्धत वापरा, मग बघा कमाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 11:15 AM

पाणी शरीरात थर्मोजेनेसिसचं प्रमाण वाढवतात, जे पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतं. तसेच पाण्यामुळे शरीरात चरबी सुद्धा एकत्र राहत नाही. चला जाणून घेऊ पाण्याने वजन कमी कसं होतं.

एका रिसर्चनुसार, जर तुम्ही रोज योग्य प्रमाणात पाणी पित असाल तर तुम्हाला वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते. १२०० लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये भरपूर पाणी पिणाऱ्या लोकांमध्ये ३ महिन्यात ४४ टक्के वजन कमी आढळलं. पाणी शरीरात थर्मोजेनेसिसचं प्रमाण वाढवतात, जे पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतं. तसेच पाण्यामुळे शरीरात चरबी सुद्धा एकत्र राहत नाही. चला जाणून घेऊ पाण्याने वजन कमी कसं होतं.

पाण्याने वजन कमी कसं होतं?

भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं, ज्यामुळे पचनक्रिया योग्यप्रकारे होते. सोबतच याने शरीरात चरबी जमा होत नाही. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी पिणं महत्वाचं ठरतं. जर तुम्ही पाणी कमी प्याल तर पचनासंबंधी समस्या होतात आणि आरोग्यही बिघडतं. पाणी दोनप्रकारे आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतं. एक म्हणजे पाणी शरीराला बर्न करणारी ऊर्जा किंवा कॅलरीचं प्रमाण वाढवतं. दुसरं म्हणजे पाणी पित राहिल्याने भूक कमी लागते किंवा सतत खाण्याची सवय कमी होते. पाणी कमी प्यायल्याने फॅट बर्न करण्याची क्षमता कमी होते.

जेवणाआधी प्यावं पाणी

जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने पोट भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्ही जेवण हवं तेवढंच कराल, ओव्हरइटिंग करणार नाही. यानेही वजन कमी करण्यास मदत मिळते. सामान्यपणे असं म्हटलं जातं की, रोज दोन लिटर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यावं.  पण रिसर्चनुसार, काही लोकांसाठी हे पाणी पिण्याचं प्रमाण ५ लिटर असू शकतं. 

लिपोलिसिस आणि थर्मोजेनेसिसला वाढवतं पाणी

(Image Credit : health.harvard.edu)

पाणी लिपोलिसिसच्या प्रोसेसचा वेग वाढवतं. लिपोलिसिस एक चयापचन प्रक्रिया आहे. ज्याच्या माध्यमातून लिपिड ट्रायग्लिसराइड्सला ग्लिसरॉल आणि फॅटी अॅसिड हायड्रोलाइज केलं जातं. बीएमआय हे व्यक्तीतील कमी वजन, जास्त वजन आणि लठ्ठपणा या स्थितीबाबत ठरवतं. पाणी शरीरात थर्मोजेनेसिसचं प्रमाण वाढवतं. थर्मोजेनेसिस एक अशी प्रोसेस आहे, ज्याने कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते.

पाणी कमी कॅलरी डाएटमध्ये 

पाणी नैसर्गिक रूपाने कॅलरी मुक्त असतं. त्यामुळे सामान्यपणे कमी कॅलरी डाएटमध्ये याचा समावेश केला जातो. जेवणाआधी पाणी प्यायल्याने मध्यम वयातील आणि वृद्ध व्यक्तींना भूक कमी लागते. याचाच परिणाम म्हणजे कॅलरीचं प्रमाण कमी होतं आणि वजनही कमी होतं. रोज जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि १२ आठवड्यात २ किलो वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे वजन कमी करणार असाल तर जेवण करण्याच्या २० ते ३० मिनिटांआधी पाणी प्यावे. नाश्त्याआधी पाण्याचं सेवन केल्याने कॅलरी १३ टक्के कमी होतात.

पाणी पिण्याची योग्य पद्धत

आयुर्वेदानुसार, पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे बसून पाणी पिणे. जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल तर पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जाईल. उभे पाहून पाणी प्यायल्याने शरीराला योग्य प्रमाणात पोषत तत्व मिळत नाहीत. सोबतच पाणी एकदाच घाईने पिण्याऐवजी एक एक घोट घेऊन आणि हळूहळू प्यावं. याचं कारण जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत आपली लाळही पोटात जाते. याने पचनक्रिया मजबूत होते.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य