शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

मुलांच्या स्क्रीन टाइमला पर्याय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 9:32 AM

मुलांना ऑफलाइन जग नेहमीच आवडतं. आपण सगळ्यांनी हे विसरता कामा नये की, ऑफलाइन जग हे ऑनलाइन जगापेक्षा नेहमीच अधिक रंजक आहे.

- मुक्ता चैतन्य, समाजमाध्यम अभ्यासकहामारीत मुलांचा स्क्रीन टाइम अचानक वाढला आणि महामारीतून  बाहेर पडल्यावरही तो आहे तसाच आहे किंवा अजूनही वाढलेला आहे. मुलांच्या हातात त्यांचे स्वतःचे फोन कोरोनाने दिले आणि त्याला काहीअंशी आपण मोठ्यांच्या जगाने मान्यता दिलेली आहे. त्यावेळी गरजेची, अत्यावश्यक वाटलेली बाब आता मात्र काळजीची बनली आहे. कारण मुलं त्यांच्या हातातला फोन सोडायला तयार नाहीत. त्यात सुट्टीत शाळाही नसते, त्यामुळे स्क्रीन टाइम अधिकच वाढणार, हे उघड आहे. अशावेळी स्क्रीन नाही तर काय या प्रश्नाचं उत्तर समजून घेणं आवश्यक आहे. 

मुलांना ऑफलाइन जग नेहमीच आवडतं. आपण सगळ्यांनी हे विसरता कामा नये की, ऑफलाइन जग हे ऑनलाइन जगापेक्षा नेहमीच अधिक रंजक आहे. मुलांना ते रंजक वाटण्यासाठी मोठ्यांच्या जगाने पहिल्यांदा मोबाइलमधून डोकं बाजूला काढलं पाहिजे. मुलांनी पुस्तकं वाचावीत आणि आम्ही यू ट्यूब बघू हे जमणार नाही. त्यामुळे मुलांनी मोबाइल सोडून जे जे करावं असं पालकांना, शिक्षकांना वाटत असेल ते त्यांनी स्वतः मुलांबरोबर प्रत्यक्ष करणं आवश्यक आहे. उदा. एकत्र पुस्तकं वाचणं, बागकाम करणं, घरातल्या भांड्यांची ओळख मुलांना करून देणं, स्वयंपाकात मदतीला घेणं, पलंगावरच्या चादरींची सुबक घडी करायला शिकवणं, कपडे नीट वळत कसे घालायचे हे दाखवणं, वाळलेल्या कपड्यांच्या नीट घड्या कशा करायच्या हे शिकवणं, घरातलं फर्निचर स्वतः पुसत मुलांना त्यात सहभागी करून घेणं. मुळात मुलांच्या आजूबाजूचे मोठे प्रत्यक्ष काहीतरी काम करताना मुलांना दिसणं आवश्यक आहे. मुलांना काहीतरी शारीरिक हालचाल असलेलं काम करावं यासाठी त्यांच्या मागे लागताना आपण मात्र एकाच जागी बसून मोबाइल बघत बसणार हे गणित आजच्या पिढीच्या मुलांबरोबर जमणं कठीण आहे. ही मुलं लगेच तू मोबाइल बघणार मग मी का नाही, हे विचारतातच. मुलांना पालकांचा वेळ हवा असतो, त्यांच्याबरोबर त्यांना गमतीजमती करायच्या असतात, त्यांच्या जगात काय सुरू आहे हे सांगायचं असतं आणि या सगळ्याला रुपयाचाही खर्च येत नाही. 

मुलं स्क्रीनपासून अशी जातील दूर गोष्टीची पुस्तकं सतत विकत आणण्याची गरज नसते, रात्री झोपताना एखादी गोष्ट आपणच रंगवून त्यांना सांगू शकतो. खेळणी विकत घ्यायची गरज नसते, घरातल्याच तुटक्या-फुटक्या गोष्टींमधून त्यांना काय हवं ते बनवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मॉलला न नेता आपलं गाव दाखवायला नेता येऊ शकतं. 

मुलांना ग्राहक बनवू नकासतत काहीतरी विकत घेतल्याने आपण आपल्याच मुलांना भविष्याचे ग्राहक म्हणून ‘तयार’ करत असतो. ग्राहक म्हणून ते तयार होणारच आहेत; पण त्याचबरोबर ‘सजग ग्राहक’ आपल्याला त्यांना बनवता येईल का हे बघणं आवश्यक आहे, कारण ऑनलाइन जगही त्यांच्याकडे सतत ग्राहक म्हणूनच बघत असतं.

‘या’ गोष्टी का करायच्या? कपडे वाळत घालणं, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करणं, स्वयंपाकातील मदत, घरातल्या भांड्यांची ओळख या सगळ्या गोष्टी जीवन कौशल्यात मोडतात.आजच्या काळात पाठ्यपुस्तकी शिक्षणाइतकंच जीवनकौशल्ये मुलांना शिकवणं गरजेचं आहे. ही कौशल्ये शिकवण्यासाठी क्लासला घालण्याची गरज नसते, ती घरातून अतिशय छोट्या छोट्या कृतींमधून शिकवता येतात. गोष्टी सांगणं हे सृजनशीलता विकसित करण्याचं सगळ्यात प्रभावी तंत्र आहे. कारण त्यात गोष्ट ऐकत असताना सांगितलेल्या गोष्टींची कल्पना करावी लागते.प्रत्येक मुलाचा कल्पनाविलास भिन्न असतो. टाकाऊ गोष्टींमधून काहीतरी बनवणं यातून आपण आपोआप मुलांपर्यंत टिकाऊपणा, पुनर्वापर या गोष्टी पोहोचवतो, ज्याची आज आपल्याला नितांत आवश्यकता आहे.