शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
2
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
3
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
4
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
5
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
6
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
7
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
8
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
9
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
10
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
11
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग
12
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
13
"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; ४६ All Out नंतर दिनेश कार्तिकचा दावा
14
Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
16
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा
17
Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण
19
“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत
20
नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊन फायदे तर मिळतातच, पण 'या' चुका टाळल्या पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:24 AM

तांबाच्या भांड्यात किंवा बॉटलमध्ये रात्रभर ठेवलेलं पाणी सकाळी झोपेतून उठल्यावर प्याल तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

Copper Bottle Water Benefits: वेगवेगळ्या धातुंचे आपल्या आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. तांब्याचाही आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने वापर केला जातो. बरेच लोक तांब्याच्या बॉटलमधील पाणीही पितात. यातून अनेक पोषक तत्व शरीरात जातात. तांबाच्या भांड्यात किंवा बॉटलमध्ये रात्रभर ठेवलेलं पाणी सकाळी झोपेतून उठल्यावर प्याल तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हे फायदे काय काय आहेत आणि हे पाणी पिताना काय चुका करू नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

१) कॅन्सर धोका टळतो

कॅन्सरला मुख्य कारण फ्री रेडिकल्स आणि त्यांचे नुकसानकारक प्रभाव आहे. तांब एक अॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात काम करून सगळ्या फ्री रेडिकल्स विरोधात लढतं. तसेच त्यांच्या नकारात्मक प्रभावांना नष्ट करतं. त्यासोबतच तांब्यातून मेलेनिनचं उप्तादन करण्यास मदत करतं. जे सूर्याच्या नुकसानकारक किरणांपासून बचाव करतो.

२) हाय ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, तांब्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रिग्लिसराइड स्तर कमी करण्यासाठी ओळखलं जातं. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जन्मापासूनच कॉपर कमी असेल तर यामुळे हायपरटेंशन वाढण्याचा धोका असतो. अशात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जाऊ शकतं.

३) एनीमियापासून बचाव

शरीरात आयर्न कमी झालं तर एनीमियाची समस्या समस्या होते. अशात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने एनीमियाची समस्या दूर करण्यास मदत मिळते. शरीरात तांब कमी झालं तर हेमेटोलॉजिकल विकार होऊ शकतो. पांढऱ्या रक्त पेशी कमी झाल्यानेही असं होतं. अशात तांब खाद्याला हीमोग्लोबिन बनवण्यास मदत करतं. याने तुमच्या शरीरातील आयर्न अवशोषित करण्यास मदत होते. 

४) पचन चांगलं होतं

आयुर्वेदात दावा केला जातो की, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं आणि शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच या पाण्याने पोटातील सूज कमी होते आणि पचन चांगलं होण्यास मदत मिळते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पोटाचा अल्सर, अपचन आणि पोटात इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना या चुका टाळा

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी सांगितलं की, तांब्याच्या भांड्यातील पाणी तेव्हाच शरीरासाठी फायदेशीर ठरतं जेव्हा तुम्ही पद्धतीने त्याच वापर कराल. अशात तांब्याच्या भांड्यातील किंवा बॉटलमधील पाणी पिताना या 3 चूका करणं टाळलं पाहिजे. नाही तर शरीरात वेदनेसह गंभीर आजारांचा धोकाही राहतो.

तांब्याच्या बॉटलने दिवसभर पाणी पिणे

जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या बॉटल किंवा भांड्यातील पाणी पित असाल तर शक्यता आहे की, तुमच्या शरीरात कॉपरचं प्रमाण जास्त होईल. यामुळे मळमळ होणे, चक्कर येणे, पोटदुखीसोबत लिव्हर आणि किडनी फेल होण्याचा धोकाही होऊ शकतो.

तांब्याच्या भांड्यात लिंबू आणि मध टाकलेल्या पाण्याचं सेवन

हे सत्य आहे की, सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध टाकलेलं पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जेव्हा तुम्ही हे पाणी तांब्याच्या भांड्यातून सेवन करता तेव्हा ते विषासारखं काम करतं. लिंबात आढळणारं आम्ल कॉपरसोबत मिळून शरीरात अॅसिड तयार करतं. ज्यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलटी होण्याचा धोका राहतो.

तांब्याची बॉटल रोज स्वच्छ करणे

तांब्याचं भांड नियमितपणे धुवू नये. रोज हे भांडं धुतल्याने यातील फायदेशीर गुण कमी होऊ लागतात. त्यामुळे एकदा वापरल्यावर ते केवळ पाण्याने धुवून घ्या. आणि महिन्यातून एकदा मीठ आणि लिंबूचा वापर करून चांगल्या प्रकारे स्वच्छ करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स