शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

'या' वयात आई होण्याचा निर्णय घेतला पाहिजे; जाणून घ्या आई-बाबा होण्याचं योग्य वय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 10:25 AM

उशिराने होणारी गर्भधारणा ही धोकादायक ठरते...

पुणे : शिक्षण आणि करिअरमुळे लग्न उशिरा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे मूल होऊ देण्याचा निर्णयही उशिरा घेतला जातो. उशिरा गर्भधारणा झाल्यास काही समस्या निर्माण होऊ शकतात. स्त्रियांच्या वयानुसार त्यांची प्रजनन क्षमतादेखील बदलत असते. उशिराने होणारी गर्भधारणा ही धोकादायक ठरते. वयाच्या पंचविशी-तिशीत पहिले मूल होऊ देणे योग्य ठरत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आर्थिक अस्थिरता, करिअरच्या दृष्टीने घेतलेली झेप, उशिरा लग्न किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे स्त्रियांनी गरोदरपणात उशीर केल्यामुळे वंधत्वासारख्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. एखाद्या महिलेच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतेचा विचार केल्यास तसेच जीवशास्त्रीयदृष्ट्या स्त्रीसाठी गर्भवती होण्याचे योग्य वय २० ते ३० वर्षे वयोगट. वाढत्या वयानुसार स्त्रियांमधील प्रजनन क्षमतादेखील कमी होऊ लागते आणि त्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो.

वाढत्या वयानुसार महिलांमधील अंड्यांची गुणवत्ता आणि प्रमाण घटू लागते. उशिरा आई होताना अंड्यांमध्ये गुणसूत्रातील दोष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गर्भधारणा होणे अवघड होते किंवा गरोदर असताना गर्भपात असण्याची भीती असते. वय वाढण्याबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते आणि परिणामी कमी प्रजनन होईल किंवा जर गर्भधारणा झाली तर अशा परिस्थितीत गर्भधारणेच्या गुंतागुंती जास्त असतात. त्यामुळे योग्य वयात गर्भधारणेचा निर्णय घेणे योग्य ठरते.

- डॉ. ममता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ

व्यंधत्वाचे प्रमाण आजकाल वाढत चालले आहे. शिक्षण आणि करिअरमुळे उशिरा लग्न होणे, मूल होऊ देण्याचा निर्णय लांबणीवर पडणे ही त्यामागील प्रमुख कारणे असू शकतात. आई-बाबा होण्याचे योग्य वय हे २५ वर्षांपर्यंत असते. जास्तीत जास्त ३० वर्षे वयापर्यंत पहिले मूल होणे गरजेचे असते. काही कारणांमुळे तिशी उलटून गेल्यास स्त्री बीजांची संख्या कमी होते, पुरुष बीजामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य वयात पहिले मूल होणे आवश्यक असते. व्यंधत्व निवारण तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य तपासण्या करून कोणत्या उपचारांची गरज आहे, हे वेळेवर समजू शकते.

- डॉ. किशोर पंडित, आयव्हीएफ तज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स