शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

भारताच्या दोन कफ सिरपबाबत WHO नं दिला मोठा इशारा! काळजी घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 17:53 IST

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) बुधवारी भारतीय औषध कंपनी मरीन बायोटेकच्या (Marion Biotech) दोन कफ सिरपबाबत इशारा दिला आहे.

नवी दिल्ली-

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) बुधवारी भारतीय औषध कंपनी मरीन बायोटेकच्या (Marion Biotech) दोन कफ सिरपबाबत इशारा दिला आहे. संघटनेनं हे दोन कफ सिरप लहान मुलांसाठी वापरले जाऊ नयेत असा सल्ला दिला आहे. WHO च्या माहितीनुसार हे दोन कफ सिरप गुणवत्ता मानकांची पूर्तता करत नाहीत आणि त्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली गेली पाहिजे. उझबेकिस्तानमध्ये १९ लहान मुलांच्या मृत्यूचं प्रकरण देखील याच कंपनीनं बनवलेल्या कफ सिरपशी संबंधित आहे. 

WHO नं जाहीर केलेल्या माहितीनुसार Ambronol सिरप आणि DOK-1 Max सिरपवर बाजारातील विक्री थांबवली गेली पाहिजे. ही दोन सिरपचं उत्पादन करणाऱ्या कंपनीचं ऑफीस नोएडा सेक्टर ६७ मध्ये आहे. 

उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं लहान मुलांच्या मृत्यूची बाब लक्षात घेत दोन सिरपची चौकशी केली होती. ज्यात दोन्ही सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचं प्रमाण अधिक होतं जे लहान मुलांच्या मृत्यूचं कारण ठरलं असं सांगितलं जात आहे. मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार श्वसनाशी निगडीत आजाराशी झुंज देणाऱ्या २१ लहान मुलांना या सिरपचं सेवन केलं होतं. ज्यातील १९ मुलांचा मृत्यू झाला होता. 

रॉयटर्सच्या माहितीनुसार आतापर्यंत मरीन कंपनीनं या सिरपबाबत सुरक्षा आणि गुणवत्तेबाबत डब्ल्यूएचओला कोणतीही गॅरंटी दिलेली नाही. उझबेकीस्तानमध्ये लहान मुलांच्या मृत्यूची माहिती समोर येताच भारताच्या आरोग्य मंत्रालयानं कंपनीच्या उत्पादनावर तातडीनं बंदी घातली होती. आता गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारनं या कंपनीचा परवानाच रद्द केला आहे. 

मरीन बायोटेक उझबेकिस्तानमध्ये २०१२ साली रजिस्टर्ड झालेली कंपनी आहे. त्याच वर्षी कंपनीनं आपल्या औषधांच्या विक्रीला सुरूवात केली होती. भारतात सध्या या कंपनीची औषधं विकली जात नाहीत. उझबेकिस्तानमध्ये १९ लहान मुलांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. याआधी गाम्बियामध्येही कफ सिरपच्या सेवनामुळे ७० मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी गाम्बियाच्या संसदीय समितीनं या मृत्यूंचं खापर नवी दिल्ली स्थित मेडेन फार्मास्युटिकल्सनं तयार केलेल्या कफ सिरपवर फोडलं होतं. दरम्यान कंपनीनं औषधाच्या गुणवत्तेत कोणतीही गडबड झाल्याचा दावा केला होता. भारत सरकारनं त्यावेळी औषधाची तपासणी देखील केली होती आणि त्यात कोणतीही तृटी आठळली नव्हती.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटना