शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

Diabetes tips: सकाळी रिकाम्यापोटी रक्तातील साखरेची पातळी का वाढते? 'ही' आहेत कारणं, डायबिटीस रुग्णांनी करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 2:51 PM

रक्तातील साखरेवर (blood sugar) नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयी बदलायला हव्या. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही गोष्टी वर्ज्य करून तुम्ही रक्तातील साखरेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता.

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळं लोकांना अनेक प्रकारचे आजार जडत आहेत. त्यात मधुमेह (Diabetes) हा देखील एक गंभीर आजार बनला आहे. मधुमेह हा इतर अनेक रोगांचं कारण बनतो. यामध्ये हृदय, मूत्रपिंड, डोळा, मेंदू आणि त्वचेवर खोलवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात (Blood Sugar Level Control) ठेवणं गरजेचं आहे.

रक्तातील साखरेवर (blood sugar) नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयी बदलायला हव्या. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही गोष्टी वर्ज्य करून तुम्ही रक्तातील साखरेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता. परंतु, काही जणांची गोड खाण्याची सवय काही केल्या कमी होत नाही आणि त्यामुळे मग खूप नुकसान होते.

सकाळी रक्तातील साखरेची पातळी का वाढते?सामान्यतः गोड किंवा आरोग्यास अपायकारक पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढते. परंतु सकाळी रिकाम्या पोटी असूनही रक्तातील साखर वाढते असं अनेक वेळा दिसून आलंय. असं का होतं हे जाणून घेऊ.

1. तज्ज्ञांच्या मते, हार्मोन्समधील बदलामुळं सकाळी रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. रात्री झोपताना हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरात जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार होतं.

2. रात्री उच्च कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेतल्यास सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी औषधं योग्य वेळी घेणं आवश्यक आहे. नाहीतर, दुसऱ्या दिवशी सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढते.

3. झोपण्यापूर्वी इन्सुलिन घेतलं आणि सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढली तर, या स्थितीला रिबाउंड हायपरग्लाइसेमिया (Rebound Hyperglycemia) म्हणतात.

सकाळी रिकाम्या पोटी साखरेची पातळी किती असते?जर सकाळी रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी 70-100 mg/dl राहिली, तर काळजी करण्यासारखं काही नाही. जर ही पातळी 100-125 mg/dl झाली तर ती सीमारेषा आहे. यापेक्षा जास्त साखर असणं हे मधुमेहाच्या श्रेणीत येतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह