शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

नारळ पाणी रात्री प्यावे की नाही? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 9:28 AM

Coconut Water : जर तुम्ही नारळ पाणी रात्री पित असाल तर याने काही नुकसानही होतात. नारळ पाणी रात्री प्यायल्याने काय काय नुकसान होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Coconut Water : नारळाचं पाणी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि अनेक गंभीर समस्यांचा धोका टाळण्यासाठी फार फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात लोक नारळाच्या पाण्याचं भरपूर सेवन करतात. यातून अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला मिळतात. पण हे फायदे शरीराला तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने त्याचं सेवन कराल. नारळ पाणी पिण्याची योग्य वेळही तुम्हाला माहीत असली पाहिजे. 

एक्सपर्टनुसार, नारळ पाणी पिण्याची सगळ्यात योग्य सकाळी आणि दुपारी आहे. पण जर तुम्ही नारळ पाणी रात्री पित असाल तर याने काही नुकसानही होतात. नारळ पाणी रात्री प्यायल्याने काय काय नुकसान होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच नारळ पाणी पिण्याची योग्य पद्धतही जाणून घेऊ.

जास्त लघवी लागणे

नारळ पाण्यात नॅचरल ड्यूरेटिक तत्व असतात. त्यामुळे रात्री नारळ पाण्याचं सेवन केल्याने तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याची समस्या होऊ शकते. याने तुमची झोपही खराब होते.

पचनासंबंधी समस्या

रात्री काही लोकांना नारळ पाण्यातील शुगर आणि इलेक्ट्रोलाइट्स पचवण्यास समस्या होऊ शकते. यामुळे पोट फुगणे, गॅस आणि पोटासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. त्यामुळे रात्री नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.

शुगर वाढू शकते

नारळ पाण्यात नॅचरल शुगर भरपूर असते. त्यामुळे रात्री नारळ पाणी प्यायल्याने काही लोकांमध्ये शुगरची लेव्हल वाढू शकते. खासकरून डायबिटीस असलेल्या लोकांनी रात्री नारळ पाणी पिऊ नये.

झोप येत नाही

नारळ पाण्यात भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात. जे ऊर्जा वाढवतात. रात्री नारळ पाण्याचं सेवन केल्याने तुमच्यातील अॅक्टिवनेस वाढतो. ज्यामुळे झोप न येण्याची समस्या होऊ शकते.

अधिक हायड्रेशन

रात्री नारळ पाणी प्यायल्याने शरीरात अधिक हायड्रेशन होऊ शकतं. अधिक हायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाइटचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे थकवा, मांसपेशींमध्ये वेदना आणि इतरही काही समस्या होऊ शकतात.

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ

मनारळ पाणी रिकाम्या पोटी किंवा दुपारी पिणं अधिक चांगलं मानलं जातं. सकाळी रिकाम्या पोटी नारळाचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. सकाळी नारळ पाणी प्याल तर हार्टबर्न, एसिडिटी आणि मॉर्निंग सिकनेस दूर होतं.

वर्कआउट करण्याआधी किंवा नंतर नारळ पाणी पिता येऊ शकतं. नारळ पाणी हे एक हायड्रेटिंग ड्रिंक आहे आणि शरीराला ऊर्जा देतं. अशात हे तुम्ही एनर्जी बूस्टिंग ड्रिंकसारखं पिऊ शकता.

दुपारच्या वेळ नारळ पाणी प्याल तर याने पचन क्रिया चांगली होते. याने डायजेशनसंबंधी वेगवेगळ्या समस्याही दूर होतात. जेवण केल्यावर पोट फुगण्याची समस्याही होत नाही. नारळ पाण्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होतात ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य