शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
3
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
4
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
5
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
6
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
7
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
8
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
9
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
10
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
11
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
12
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
13
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
14
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
15
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
16
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
17
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
18
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
19
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
20
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

महिलांनो, वजन ठेवा आटोक्यात. शास्त्रज्ञांचा सल्ला

By admin | Published: May 22, 2017 3:51 PM

सावधान. विशीनंतर वर्षाला पाऊणेदोन किलोपेक्षा अधिक वजन वाढत असेल, तर आजारांनी व्हाल त्रस्त

 - मयूर पठाडे

 
आरोग्याचं एक सर्वसाधारण सूत्र आहे. विविध प्रकारच्या आजारांपासून तुम्हाला वचायचं असेल तर आधी तुमचं वजन आटोक्यात ठेवा. कारण बरचसे आजार आपल्या चुकीच्या लाइफस्टाइलमुळे होतात. त्याचं पहिलं प्रतिबिंब पडतं ते आपल्या वजनात. त्यामुळे त्या त्या रोगांशी लढताना आणि त्यांना प्रतिबंध घालतानाही तुम्हाला पहिल्यांदा दोन हात करावे लागतात, ते या वाढत्या आणि वाढलेल्या वजनाशीच.
 
नुकत्याच झालेल्या संशोधनानं तर शास्त्रज्ञांनी सर्वांना; विशेषत: महिलांना सावधानतेचा इशारा दिला आहे, तुमच्या विशीत असतानाच तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा. हे नियंत्रण जर सुटलं तर त्यावर कंट्रोल ठेवणं नंतर अवघड जातं आणि भविष्यात तुम्हाला लठ्ठपणालाही सामोरं जावं लागू शकतं. 
त्यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅँड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी विशीतील आणि तिशीतील महिलांचा अभ्यास केला आणि एक निष्कर्ष काढला. हा निष्कर्ष आणखी सोपा करून सांगताना या संशोधकांनी सरळ एक आराखडाच तयार केला.
वयाच्या विशीत असताना तुमचं वजन फार वाढू देऊ नका. समजा वयाच्या विशीत तुमचह वजन दरवर्षी साधारण पाऊणेदोन किलो किंवा त्यापेक्षा थोडं अधिक वाढत असेल, तर वयाच्या चाळीशीपर्यंत तुम्ही चांगले लठ्ठ झालेले असाल आणि आरोग्याच्या संदर्भातील अनेक व्याधींनी तुम्हाला घेरलेलंही असेल. 
वजन वर्षाला पाऊणेदोन किलो, म्हणजे काही फार नाही, महिन्याला छटाक दोन छटाक वजन वाढलं तर असं काय मोठं बिघडलं, असं कुणाला वाटू शकेल, पण त्यामुळे भविष्यात त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना समाोरं जावं लागू शकतं. 
त्यामुळे शास्त्रज्ञांनी महिलांना करायला अगदी सो असा सल्ला दिला आहे. वयाच्या विशीत असताना दीर्घ काळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपलं वजन वर्षाला पाऊणेदोन किलोपेक्षा जास्त वाढू देऊ नका. 
 
वजन वाढल्यानं काय होतं?
 
 
वजन आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देतं. वाढतं वजन एकाचवेळी दोन मोठय़ा समस्यांना साोबत घेऊन येतं, ते म्हणजे लठ्ठपणा आणि डायबेटिस. एकदा हे दोघं आले की मग इतर आजारांनाही ते घरोबा करून देतात. 
विशषत: लाइफस्टाइलमुळे हे आजार होतात, पण या आजारांमुळे पुन्हा आपोआप तुमची लाइफस्टाइल बदलते, असं हे दुहेरी दुष्टचक्र आहे. 
शिवाय वाढत्या वजनामुळे होणारं मृत्यूंचं प्रमाणही खूप मोठं आहे. 
 
का वाढतं वजन?
वजन वाढीची अनेक कारणं आहेत. त्यात धुम्रपान हे एक. पण विशेषत: महिलांमध्ये वजनवाढीचं एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे लग्नानंतर गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाचं प्रमाण. त्यामुळे वजन वाढू शकतं. याशिवाय वैवाहिक समस्या, घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू, सांसारिक टेन्शन्स. यामळे महिलांचं वजन वाढू शकतं. रजोनिवृत्तीनंतरच्या काळात त्यामुळे छातीचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.