शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
2
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
3
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
4
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
5
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
6
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
7
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
8
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
9
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
10
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
11
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
12
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
13
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
14
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
15
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
16
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
17
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
18
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
19
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
20
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते

नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत चार जिल्ह्यांतील १४४ पैकी १०९ तलाव तुडुंब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 1:43 PM

दरवर्षी पावसाळ्यात तलावांमध्ये होणाऱ्या पाणीसाठ्याच्या भरोशावर उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जाते.

हिंगोली : नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांमधील १४४ तलावांपैकी १०९ तलाव सद्य:स्थितीला तुडुंब भरले आहेत. परतीचा पाऊसही आता थांबला असून, हेच पाणी उन्हाळ्यासाठी वापरावे लागणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात तलावांमध्ये होणाऱ्या पाणीसाठ्याच्या भरोशावर उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये होणारा जलसाठा महत्त्वपूर्ण ठरतो. यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीला अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर अनेक भागांमध्ये परतीचा जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पातील पाणी आता रब्बी हंगामातील सिंचनासह उन्हाळ्यामधील पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणार आहे.

नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात १०४ तलाव आहेत. त्यामध्ये दोन मोठे प्रकल्प, नऊ मध्यम प्रकल्प, नऊ उच्च पातळी बंधारे, ८० लघुप्रकल्प आणि चार कोल्हापुरी बंधाऱ्यांचा समावेश आहे. दोन्ही मोठे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. आठ मध्यम प्रकल्प आणि एक उच्चपातळी बंधारा, तर ८० पैकी ७० तलावांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील एक मोठा प्रकल्प, २५ लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. परभणी जिल्ह्यात एकूण ९ प्रकल्प आहेत. त्यापैकी एक उच्च पातळी बंधारा आणि एक लघुप्रकल्प अशा दोनच प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प असून, त्यातही ७६ ते १०० टक्क्यांपर्यंतचा पाणीसाठा आहे.

१४४ पैकी १०९ प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने जिल्हावासीयांची उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. परतीचा पाऊसही आता थांबला असून, या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यताही आता उरली नाही. त्यामुळे झालेला पाणीसाठा उन्हाळ्यापर्यंत पुरविण्याची कसरत पाटबंधारे मंडळाला करावी लागणार आहे.

सात प्रकल्प अजूनही ज्योत्याखालीपरभणी जिल्ह्यातील एक, हिंगोली जिल्ह्यातील दोन, नांदेड जिल्ह्यातील चार अशा सात प्रकल्पांमध्ये अजूनही पाणीसाठा झाला नाही. या प्रकल्पातील पाणीसाठा सध्या जोत्याखाली आहे.कोणत्या जिल्ह्यात किती प्रकल्प १०० टक्के

नांदेड : ८१हिंगोली : २६परभणी : २यवतमाळ : १

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसDamधरणHingoliहिंगोली