शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

कौटुंबिक हिंसाचाराच्या जिल्ह्यात १२२५ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:53 IST

जिल्ह्यात मागील बारा वर्षांत कौटुंबिक हिंसाचाराच्या १२२५ घटना घडल्या आहेत. न्यायालयात दाखल ३३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणात संरक्षण आदेश, मुलांचा ताबा, नुकसान भरपाई, निवास व अर्थसहाय्याचे आदेश दिले आहेत.

दयाशील इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील बारा वर्षांत कौटुंबिक हिंसाचाराच्या १२२५ घटना घडल्या आहेत. न्यायालयात दाखल ३३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणात संरक्षण आदेश, मुलांचा ताबा, नुकसान भरपाई, निवास व अर्थसहाय्याचे आदेश दिले आहेत.चार भिंतीच्या आत आजही महिलांवर होणारे अत्याचार कमी नाहीत. त्यामुळे आपल्याच घरात अनेक महिला असुरक्षित असल्याचे कौटुंबिक हिसांचाराच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दिवसेंदिवस महिलांवरील वाढते अत्याचार एक सामाजिक आणि गंभीर समस्या बनली आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यातर्फे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संरक्षण अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या एकत्रित माहितीच्या अहवालावरून सन २००६ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर केली आहे. या कालावधीत जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमअंतर्गत १२२५ प्रकरणे प्राप्त झाल्याची माहिती आहे. यापैकी न्यायालयात निकाली निघालेली प्रकरणे ३३५ आहेत. निकाली निघालेल्या प्रकरणात न्यायालयाने आदेशाची वर्गवारी केली. यामध्ये १७ पीडितांना संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर मुलांचा ताबा आदेश ६, नुकसान भरपाई आदेश १७, निवासाचे आदेश ९, अर्थसहाय्यचे आदेश ४८ दिले आहेत. तसेच यातील इतर प्रकरणे सामंजस्याने किंवा तडजोडीअंती मिटविण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत न्यायदंडाधिकारी हे पिडित महिलेस त्रास देणाºया पती किंवा इतर नातेवाईक (लाईव्ह ईन रिलेशिअनशीप) या तत्त्वानुसार एकत्र राहणारा पुरूष साथीदार अथवा त्याचे नातेवाईकांकडून शारीरिक, लैंगिक, आर्थिक आणि तोंडी किंवा भावनिक अत्याचाराने पीडित महिलांना निवासाच्या अधिकारासह सुरक्षिततेसाठी आदेश काढून संवैधानिक अधिकार सुरक्षित करू शकतात. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ व नियम २००६ भारतात २६ आॅक्टोबर २००६ पासून लागू करण्यात आला आहे.महिलांना कुटुंबात व कुटुंबाहेरही विविध अत्याचाराला तोंड द्यावे लागते. या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाय-योजना केल्या जात असून पीडितांचे समुपदेशन केले जाते.राज्यात ३७७४ संरक्षण अधिकारी कार्यरत४राज्यात ३७७४ संरक्षण अधिकारी कार्यरत आहेत. शासनाने राज्यातील सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी व विस्तार अधिकाºयांना संरक्षण अधिकारी म्हणून घोषित केलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यात संरक्षण अधिकाºयांचे कार्यक्षेत्रही निश्चित करण्यात आलेले आहेत. एखाद्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेबाबत त्या कार्यक्षेत्रातील अधिकाºयांची माहिती हवी असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधता येतो.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrime Newsगुन्हेगारी