शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

२२२० करदात्या शेतकऱ्यांचा पेन्शन परतीच्या नोटिशीला ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:23 AM

हिंगोली : पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षात तीन हप्त्यात सहा हजारांची पेन्शन देण्यात येते. यात २६६५ करदाते तर ६४०० ...

हिंगोली : पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षात तीन हप्त्यात सहा हजारांची पेन्शन देण्यात येते. यात २६६५ करदाते तर ६४०० अपात्र शेतकऱ्यांनीही ६.८० कोटींचा लाभ उचलला. मात्र, २२२० करदाते प्रशासनाने नोटिसा बजावूनही दाद देत नसल्याचे चित्र आहे.

हिंगोली जिल्ह्यात पीएम किसान योजनेत जवळपास २.०३ लाख लाभार्थी शेतकरी आहेत. आधी प्रशासनाकडून या शेतकऱ्यांच्या नोंदी करून पहिला हप्ता त्यांना देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी १.१० लाखच लाभार्थी समोर आले होते. नंतर तक्रारी वाढल्या अन् शेतकऱ्यांनीच नोंदी करण्यासाठी बाहेरून ई-सुविधा केंद्रावरूनच व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी भरमसाट नोंदी केल्या. त्यात पात्र शेतकऱ्यांना थेट नोंदणीचा फायदा झाला असला तरीही अनेक अपात्र शेतकऱ्यांनीही घुसखोरी केली. शिवाय, यात करदात्या शेतकऱ्यांचीही नोंदणी झाल्याचे नंतर समोर आले. त्यामुळे शासनाने पडताळणी करून अशांकडील रकमा परत घेण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्याला काही जण वगळता इतरांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्याममुळे केवळ ५८ लाख वसूल झाले असून, अजून ६.२० कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे.

आतापर्यंत ४४ लाख वसूल

हिंगोली जिल्ह्यात करदाते असलेल्या २२६५ शेतकऱ्यांना २.३५ कोटी रुपयांचा लाभ पीएम किसान योजनेत मिळाला आहे.

यापैकी ४६८ शेतकऱ्यांनी रक्कम परत केली किंवा करण्यास प्रारंभ केला. ही रक्कम ४४ लाख एवढी आहे.

अजूनही १.८५ कोटी रुपयांची वसुली बाकी असून, जवळपास २२२० शेतकऱ्यांनी अजून छदामही परत केला नाही. अशांना नोटिसा देऊनही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

अपात्र शेतकऱ्यांकडेही ४.३० कोटी

६४०० अपात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात आल्याने पीएम किसानमधून जवळपास ४.४४ कोटी रुपये अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. मात्र, यापैकी केवळ १८० शेतकऱ्यांनीच रक्कम परत केली आहे, तर ही रक्कम १४ लाखांची आहे. अजून ४.३० कोटी परत येणे बाकी आहे. यातील अनेक शेतकरी तर जागेवर सापडतही नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध कसा घ्यायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान पेन्शन योजनेचे लाभार्थी

२.०३ लाख

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी ६४८

पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी ३५००

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी ८४१४

पीएम किसान योजनेतील करदाते व अपात्र शेतकऱ्यांना मध्यंतरी नोटिसा दिल्यानंतर काही प्रमाणात वसुली वाढली आहे. मात्र, जे शेतकरी प्रतिसाद देत नाहीत. त्याबाबत शासनाकडून वसुलीसाठी त्यांच्या खात्याला ऑटो डेबिटची सोय करण्याचा प्रयत्न चालू आहे.

-चंद्रकांत सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी