शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

आरटीईअंतर्गत ३३८ बालकांचा प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:30 AM

हिंगोली : वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठीच्या २५ टक्के राखीव जागांवर ३३८ विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेतला आहे, तर १८२ ...

हिंगोली : वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठीच्या २५ टक्के राखीव जागांवर ३३८ विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेतला आहे, तर १८२ बालकांनी तात्पुरता प्रवेश घेतला असून पालकांचे दुसऱ्या फेरीकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शासनाने आरटीईअंतर्गत शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील ७९ शाळांनी यासाठी नोंदणी केली होती. यामध्ये राखीव ५३० जागांसाठी राज्यस्तरीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. कोरोनामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढही मिळाली होती. त्यानुसार ५३० जागांसाठी ९८७ बालकांचे ऑनलाइन अर्ज आले होते. पहिल्या प्रवेश फेरीसाठी ४७८ बालकांची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या बालकांनी ३१ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र मोफत प्रवेशासाठी पालकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ३१ जुलैअखेर ३३८ बालकांचाच प्रवेश निश्चित झाला आहे, तर १८२ बालकांनी तात्पुरता प्रवेश घेतला आहे.

दुसऱ्या फेरीकडे पालकांचे लक्ष

पहिल्या फेरीत ४७८ बालकांची निवड करण्यात आली होती. मात्र यातील ३३८ बालकांनीच प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे आणखी १९२ जागांवर प्रवेश देणे बाकी आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या बालकांनी शाळेत प्रवेश घेण्यासाठीची मुदत संपली आहे. त्यामुळे दुसरी प्रवेश फेरी केव्हा लागते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

आरटीईअंतर्गत अशी आहे आकडेवारी

आरटीईअंतर्गंत शाळा - ७९

एकूण राखीव जागा - ५३०

एकूण अर्ज - ९८७

पहिल्या फेरीत निवड - ४७८

तात्पुरते प्रवेश - १८२

प्रवेश निश्चित - ३३८