शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उन्हाच्या कडाक्यातही ६४% मतदान; हिंगोलीच्या मतदारांत दिसला उत्साह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:15 IST

लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले.नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. कालच्यापेक्षा आज उन्हाचा पारा चढला होता. ३९ अंश सेल्सिअसवर पारा गेला असताना हिंगोली मतदारसंघात ६४ टक्के मतदानाची नोंद झाली.

हिंगोली : लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले.नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. कालच्यापेक्षा आज उन्हाचा पारा चढला होता. ३९ अंश सेल्सिअसवर पारा गेला असताना हिंगोली मतदारसंघात ६४ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी ९ पर्यंत ७.६८ टक्के, ११ वाजेपर्यंत २0.५६ टक्के, १ वाजेपर्यंत ३४.0१ टक्के, ३ वाजेपर्यंत ४५.९७ टक्के तर पाच वाजेपर्यंत ५६.२२ टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर या टक्केवारीत काहीअंशी बदल होण्याची शक्यता आहे.हिंगोलीमध्ये काँग्रेसचे सुभाष वानखेडे व सेनेचे हेमंत पाटील यांच्यातच मुख्य लढत होती. काही ठिकाणी मात्र वंचित आघाडीही बऱ्यापैकी चालत असल्याचे दिसले. नेत्यांच्या विजयासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शक्ती पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीत पहिल्यांदाच ‘ईव्हीएम’सोबतच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर केला. काही ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड तर काही ठिकाणी ‘व्हीव्हीपॅट’च्या ‘स्लीप’ न दिसणे यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. मतदार यादीतील घोळामुळे मतदारांची तारांबळ उडाली. काही मतदार मतदानापासून वंचित राहिले.आज दिवसभर उन्हाचा कडाका कमीच होता. त्यामुळे मतदारांचा उत्साह कायम होता. सकाळपासूनच विविध ठिकाणी मतदारांच्या रांगा पहायला मिळत होत्या. हिंगोली व उमरखेड मतदारसंघात मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३ टक्क्यांवर व किनवटला ५४ टक्क्यांवरच मतदान होते. तर कळमनुरी ६१ टक्के, किनवट ५८.३३ टक्के, वसमत ५७.१0 टक्के अशी उत्साहवर्धक स्थिती होती. मागच्या निवडणुकीपेक्षा यंदा टक्केवारी वाढेल, असे मानले जात होते. मात्र अंतिम आकडेवारी तेवढ्यापर्यंतच राहील, असे दिसते. २00९ साली ५९.७१ टक्के तर २0१४ साली ६६.१0 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा ६४ टक्क्यांचा अंदाज प्रशासनाने वर्तविला. तो मागच्यापेक्षा दोन टक्क्यांनी कमी आहे. मात्र प्रशासनाने अंतिम आकडेवारी जाहीर केल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.... अन् नववधू वाजत-गाजत मतदान केंद्रावर !लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील वधूने बोहल्यावर चढण्याआधीच वाजतगाजत मिरवणूक काढून मतदानाचा हक्क बजावला आहे. या मिरवणुकीची सर्वत्र चर्चा होत आहे.हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाटेगाव येथील सोनी अवधूतराव हक्के हिचा विवाह श्रीकांत मस्के (रा. जयपूर, ता. वाशिम) या नवरदेवाशी १८ एप्रिल रोजी ११ वाजता ठरल्याप्रमाणे आज पार पडला. मात्र मुलगी तिच्या आयुष्यातील वैयक्तिक आनंदाच्या क्षणात मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी तिच्या वडिलांनी पुढाकार घेतला. लग्नाच्या आधी सकाळीच वधूची वाजतगाजत मिरवणूक काढली. त्यानंतर वधूने तेथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नवरीचे वडील पोलीस पाटील अवधूतराव हक्के, संजय बहातरे, अकलवंत राठोड, संदीप राठोड, तलाठी आर. डी. गिरी, राजू क्षीरसागर, झोनल आॅफिसर भागानागरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. एरवी मुलाची वरात निघते. मात्र वधूही वरातीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावत असल्याचे वेगळे दृश्य येथे दिसले.तांत्रिक बिघाडांमुळे काही ठिकाणी विलंबहिंगोली : मतदान यंत्र अथवा व्हीव्हीपॅटमधील तांत्रिक बिघाडामुळे काही ठिकाणी मतदानाची प्रक्रिया खोळंबल्याचे चित्र होते.औंढा शहरातील नागनाथ विद्यालयातील बुथ क्रमांक १८५वर असा प्रकार घडला होता. त्यामुळे मतदान विलंबाने सुरू झाले. तालुक्यातील असोला ढोबळे येथे मशीनमध्ये बिघाडामुळे मतदान सकाळी ८.0५ मिनिटांनी सुरू झाले. नंतर सुरळीत सुरू होते. वसमत तालुक्यातील गिरगाव येथे बुथ क्रमांक १८८ वर पूर्णपणे मतदान मशीन बदलण्यात आली. सात वाजून ४0 मिनिटांनी मतदानाला सुरुवात झाली. तर कोठारी येथे व्हीव्हीपॅट मशीन बदलून लगेच मतदानाला सुरुवात झाली. कुरुंदा १४0 क्रमांकाच्या बुथवर तांत्रिक दुरुस्ती करून लगेच मतदानास सुरुवात झाली. कोठारी येथेही मतदारयंत्रामध्ये तांत्रिक दोषामुळे मतदान सुरू होण्यास विलंब झाला होता. येथे ७.३० नंतर मतदानास सुरवात झाली.सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील बुथ क्रमांक ८३ वरील ईव्हीएम मशीन सकाळी ७ वाजल्यापासून तांत्रिक बिघाडामुळे जवळपास दीड तास बंद होती. ती एरर दाखवत असल्याने मशीन सेट बदलला. नंतर ८.२५ मिनिटांनी मतदानाला सुरळीत सुरुवात झाली. आजेगाव येथेही असाच प्रकार घडला होता.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक