शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

पावसाळ्यातील दीड महिना लोटला; हिंगोलीत २६ टक्के, तर नांदेडमध्ये २४ टक्केच पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 7:40 PM

नांदेड येथील पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याच्या नोंदी घेतल्या जातात.

हिंगोली : यावर्षीच्या पावसाळ्यातील दीड महिन्याचा कालावधी लोटला असून, त्यात नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २४.२१ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २६.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यावर्षी तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा होईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

नांदेड येथील पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याच्या नोंदी घेतल्या जातात. नांदेड जिल्ह्यात मानार, विष्णुपुरी हे दोन मोठे प्रकल्प आहेत. मानार प्रकल्पात ३७.२० दलघमी उपयुक्त जलसाठा झाला आहे तर विष्णुपुरी प्रकल्पात ४७.३० दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. नांदेडच्या ९ मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून २९.५९ दलघी आणि ९ उच्च पातळी बंधाऱ्यात २८.९७ दलघमी पाणीसाठा आहे. तर लघू प्रकल्पांमध्ये ३३.२४ दलघमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांत २५४ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. त्या तुलनेत सध्या केवळ १७६.२९ दलघमी पाणीसाठा झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात येलदरी हा सर्वात मोठा प्रकल्प असून, त्यात सध्या २४३.६३ दलघमी (३० टक्के) पाणीसाठा झाला आहे. सिद्धेश्वर प्रकल्प अजूनही कोरडाच आहे. तर २७ लघू प्रकल्पांमध्ये ७.६० दलघमी पाणीसाठा आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यात केवळ १.५२ दलघमी जलसंचय झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील ३ उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये २९.४३ दलघमी पाणीसाठा झाला आहे. दोन कोल्हापुरी बंधाऱ्यात १.४८ दलघमी पाणीसाठा झालेला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९८.२५ दलघमी पाणीसाठ्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात ३०.९२ दलघमी पाणीसाठा झाला आहे.

गतवर्षी होता ४३ टक्के पाणीसाठानांदेड, परभणी आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १५२४ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. प्रत्यक्षात ८३० दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी ३०.३२ टक्के एवढी आहे. मागील वर्षी याच प्रकल्पांमध्ये ११९४.४१ दलघमी पाणीसाठा झाला होता. त्याची टक्केवारी ४३.५९ टक्के एवढी होती.

कोणत्या प्रकल्पात किती टक्के साठा?मानार : २६.९२विष्णुपुरी : ५८.५५येलदरी : ३०.०९सिद्धेश्वर : निरंकइसापूर : ३८.४७

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीNandedनांदेड