शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अचानक आलेल्या वादळाने झोपडीवरील पत्रे उडाली, गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 12:00 IST

कळमनुरीत वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

कळमनुरी ( जि.हिंगोली): कळमनुरी शहरासह परिसरास मंगळवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान वादळी वारा व गारपिटीचा तडाखा बसला. यात तालुक्यातील जटाळवाडी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

मंगळवारी रात्री अचानक वातावरणात बदल झाला आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जटाळवाडी येथे वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस सुरू झाल्याने देवराव रुद्राजी बाभळे ( 65) यांनी शेतातील झोपडीचा सहारा घेतला. मात्र, वादळाने झोपडीवरील टीनपत्रे उडून गेली. यातच गारपीटीचा मारा वाढला. थंडी, पाऊस आणि गारपीटीच्या मर्याने हृदयविकाराचा झटका येऊन बाभळे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नायब तहसीलदार आनंदराव सुळे यांनी दिली. 

यासोबतच कनका येथेही वादळ वारा व गारांच्या पावसामुळे बापूराव जाधव यांच्या चार शेळ्या, एका गाईचा मृत्यू झाला. तसेच वादळी वाऱ्याने टीनपत्रे उडून दगडाने चार जण जखमी झाले आहेत. कळमनुरी शहरासह मुंढळ, रामवाडी, वाकोडी, आसोलवाडी, मसोड, जटाळवाडी ,कनका, राजुरा ,शिवणी( खुर्द) या परिसरात बागायती पिके पपई, करडई, आंबे, कांद्याच्या बिया व संत्रा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर झाडेही ऊनमडून पडली आहेत. महावितरणचे विजेचे पोल व तारांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गारपीटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून  अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तलाठ्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्रHailstormगारपीटHingoliहिंगोली