शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Shivsena: काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं ते गद्दार, संतोष बांगर शिवसेना समर्थकावर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 12:56 IST

धाराशिववरुन भाऊसाहेब मुंढे बोलतो, असे म्हणत एका शिवसेना कार्यकर्त्याने संतोष बांगर यांना फोन केला.

मुंबई/हिंगोली - आम्ही बंडखोर, गद्दार नाही, कुणी शिवसेनेचा बंडखोर, गद्दार म्हणून हिणवत असेल तर ऐकून घेणार नाही. त्यांचे कानशील लाल करू, असा इशारा कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिला होता. दरम्यान, संतोष बांगर यांच्या या आव्हानानंतर आता शिवसेना समर्थकांकडून त्यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तुम्हाला लाखवेळा गद्दार म्हणणार, हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी माझ्या कानाखाली मारून दाखवावीच, असं आव्हान शिवसेनेच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी आमदार बांगर यांना दिले होते. त्यानंतर, आता आणखी दोन शिवसेना समर्थकांनी फोन करुन बांगर यांची फिरकी घेतल्याचं दिसून आलं आहे. सध्या हे कॉल रेकॉर्डींग व्हायरल झालं आहे. 

धाराशिववरुन भाऊसाहेब मुंढे बोलतो, असे म्हणत एका शिवसेना कार्यकर्त्याने संतोष बांगर यांना फोन केला. गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा हे तुमचं विधान ऐकून फोन केल्याचे सांगितले. तसेच, तुम्ही स्वत: कानाखाली आवाज काढायला पाहिजे, गोरगरीब लोकांच्या मुलांना चेतावणी देऊन कशाला सांगतात, असा सवाल मुंढे यांनी केला. त्यावेळी, संतोष बांगर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणारेच गद्दार आहेत, असे म्हटले. तसेच, फोन ठेवा म्हणत फोन कट केला. भाऊ बेरड नावाच्या कळमनुरी मतदारसंघातील मतदारानेही बांगर यांना फोन केला होता. मी नगरला नोकरीसाठी असतो, तुमचं अभिनंदन करायचं होतं. जाता-जाता नगरमार्गे आलात तर सत्कार करायचा होता, असे बेरड यांनी म्हटले. त्यानंतर, तुम्हाला 50 कोटी मिळालेत, मला गरज आहे मला 50 लाख रुपये द्या, मी सहा महिन्यात परत करतो, अशी मागणीही बेरड यांनी फोनद्वारे केली. त्यावर, या ना देतो... उद्याच या... असे म्हणत बांगर यांनी फोनवरील व्यक्तीला प्रतिसाद दिला. सध्या हे कॉल रेकॉर्डींग चांगलंच व्हायरल झालं आहे. 

अयोध्या पौळचा बांगर यांना इशारा

संतोष बांगर म्हणताहेत की, आम्हाला गद्दार म्हणायचं नाही, बंडखोर म्हणायचं नाही. तसं म्हटल्यास आमचे शिवसैनिक तिथे जाऊन त्यांच्या कानाखाली आवाज काढतील. मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना जेवढं ओळखते, ते असं लोकांच्या पाठीत खंजिर खुपसणारे नाही आहेत. मला केवळ बांगर यांच्याकडून धमक्या आलेल्या नाहीत तर मला स्थानिक पातळीवरूनही धमक्या आल्या आहेत, अशी माहिती अयोध्या पौळ यांनी दिली. 

मला धमक्या आल्या, मी आदित्य ठाकरेंना सांगितलं

मी आधी सर्वांच्या पोस्ट लिहायचे. मात्र जेव्हा मी बालाजी कल्याणकर यांच नाव घेऊन पोस्ट लिहिल्या. त्यानंतर मला भायखळ्यातून पोस्ट लिहिल्या तेव्हा मला भायखळ्यातून फोन आले. तुम्ही आमच्या मॅडमविरुद्ध लिहायचं नाही, अशी धमकी देण्यात आली. मात्र मी तोपर्यंत काहीच लिहिलं नव्हतं. मी अशी मुलगी आहे की, जी गोष्ट मला काही करू नको म्हणून सांगितलं जातं, ती गोष्ट मी आधी करते. काय करतील करून करून, पाय मोडतील, जीव घेतील. माझे आई-वडील म्हणतील की, लेकीने शिवसेनेसाठी स्वत:चा जीव दिला. तसं झालं तर माझ्यासारखं भाग्यवान कुणीच नसेल, असं अयोध्या पौळ म्हणाल्या.

जेव्हा मला भायखळ्यातून धमक्या आल्या तेव्हा मी सर्वप्रथम सेनाभवनला गेले. तिथे महिलांची मिटिंग होती. तिथे आदित्य ठाकरेंच्या कानावर ही गोष्ट घातली. तसेच दोन दिवसांनंतर २०८,२०९ मध्ये आदित्य यांची मिटिंग होती तेव्हा तिथे एका महिलेनं तू इथे कशाला आलीस म्हणून विचारणा करत, गैरवर्तन केलं. दरम्यान, उद्धव ठाकरेंसोबत जेव्हा मिटिंग झाली तेव्हा मी माझा जीव गेला तरी शिवसेनेची बाजू मांडणं थांबवणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं, असेही अयोध्या पौळ यांनी सांगितले. 

टॅग्स :MLAआमदारShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोलीEknath Shindeएकनाथ शिंदे