शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

रस्ता बंद असल्याने चिखल तुडवत झोळीतून वृद्धाला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 22:34 IST

Hingoli : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द हे गाव नेहमीच  थोड्याशा पावसानेही बाळापूरचा संपर्क तुटणारे गाव आहे.

आखाडा बाळापूर ( हिंगोली) :  रात्रीपासून पाऊस सुरू झाल्याने पुन्हा धांडे पिंपरी (खुर्द) रस्त्यावरील ओढ्याला पूर आला आणि बाळापूर -कान्हेगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. गावातील वृद्ध संभाजीराव धांडे यांना दवाखान्यात नेण्यासाठी चिखलाचा मार्ग निवडावा लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना झोळीत टाकून चिखल तुडवत बाळापुरच्या दवाखान्यात नेण्यात आले. परंतु रस्त्यातच त्यांनी प्राण सोडला. ही घटना दिनांक 18 जुलै रोजी सकाळी बाराच्या सुमारास घडली. 

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द हे गाव नेहमीच  थोड्याशा पावसानेही बाळापूरचा संपर्क तुटणारे गाव आहे. चिखली, पिंपरी , कान्हेगाव हा मार्ग असलेल्या रस्त्यावर कयाधू नदी लगत असलेल्या नाल्यावर छोटा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून थोड्याशा पावसानेही पाणी वाहत असते.  गेल्या तीन दिवसांपासून हा मार्ग ठप्प होता. काल रात्री पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा हा मार्ग बंद पडला. आज दिनांक 18 जुलै रोजी धांडे पिंपरी येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच संभाजीराव धांडे (वय 75 वर्ष) यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे बाळापुरला दवाखान्यात घेऊन जात होते. गावातून चालत निघालेल्या संभाजीराव धांडे यांना दम्याचा त्रास होता. मध्येच तो त्रास वाढल्याने त्यांना उचलून न्यावे लागले. परंतु चिखलाचा रस्ता असल्यामुळे मुख्य मार्ग बंद असल्यामुळे कॅनॉलच्या मार्गाने जावे लागत होते. जवळपास अर्धा किलोमीटर हा मार्ग चिखलातून जातो. 

चिखलातून त्यांना उचलून नेणे अवघड होत असल्याने कपड्याची झोळी तयार करून त्यांना त्यात टाकून गावातील तरुण गोविंद धांडे, सुरेश धांडे, केशव धांडे, बबन धांडे, संदीप धांडे, पोलीस पाटील रमेश धांडे, अतन धांडे यांनी लाकडाला बांधून पांघरुणाच्या कपड्याची झोळी तयार केली आणि त्यात संभाजीराव धांडे यांना बसवून तब्बल अर्धा किलोमीटरचे अंतर चिखल तुडवत कॅनल रोड पर्यंत आणले. त्यानंतर तिथून दुचाकीवर बसवून आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. ते मयत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यांना वैद्यकीय उपचार मिळण्यास उशीर झाला. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

पुन्हा त्यांचा मृतदेह चिखलाचा रस्ता तुडवत न्यावा लागला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर  गावालगतच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.नेहमीच रस्ता बंद होत असल्याने कान्हेगाव, पिंपरी आणि चिखली या गावातील ग्रामस्थांना खूप त्रास सहन करावा लागतो. आता नागरिकांवर जीव गमावण्याचीही वेळ आली आहे. येथील पुलाची आणि रस्त्याची उंची वाढवल्याशिवाय हा प्रश्न कायमचा निकाली निघणार नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. 

दर पावसाळ्यात मरणयातना भोगतो - पोलीस पाटील रमेश धांडे बाळापुरपासून जाणारा हा मार्ग चिखली , कान्हेगाव आणि पिंपरी या तीन गावांसाठीचा एकमेव मार्ग आहे. राष्ट्रीय महामार्गापासून केवळ एक किलोमीटरच्या अंतरावर हा रस्ता आहे. परंतु ओढ्यावरील पुलाची उंची कमी असल्याने थोडासाही पाऊस झाला की कायम हा मार्ग रहदारीसाठी बंद होतो. याबाबत दरवर्षी प्रशासन पाहणीसाठी येते. परंतु या रस्त्याची आणि पुलाची उंची वाढवण्यासाठी काहीच करत नाही. दरवर्षी या भागातील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागतात. आता तरी प्रशासनाने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी पोलीस पाटील रमेश धांडे यांनी केली आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली