शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

हिंगोलीसाठी योजना आणा, मंजुरी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:33 AM

हिंगोली : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी कोणत्याही योजनेचा प्रस्ताव घेऊन या, त्याला मंजुरी देऊन हिंगोली जिल्ह्याला ...

हिंगोली : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी कोणत्याही योजनेचा प्रस्ताव घेऊन या, त्याला मंजुरी देऊन हिंगोली जिल्ह्याला मदत करण्याची मनोमन इच्छा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सामाजिक अधिकारता कार्यक्रमात ऑनलाईन भाषणात केले.

या कार्यक्रमास खा. हेमंत पाटील, आ .तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, समाजकल्याण अधिकारी मिनगिरे यांच्यासह एलिम्कोचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आठवले म्हणाले, दिव्यांगांना योग्य ती मदत मिळावी, ही आमची कायम भूमिका राहिली आहे. एकवेळ सर्वसाधारण माणूस तर मनाने दिव्यांग असू शकतो; मात्र दिव्यांग बांधव मनाने खंबीर असतात. त्यांना योग्यप्रकारचे साहित्य व वातावरण मिळाले, तर ते स्वत:ला सिद्ध करतात, असा माझा अनुभव आहे. हिंगोलीत ३ हजार लाभार्थ्यांना विविधप्रकारचे साहित्य मिळत आहे. खा. पाटील यांनी यासाठी केलेला पाठपुरावा वाखाणण्याजोगा आहे, असेही ते म्हणाले.

खा. पाटील म्हणाले, सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी केलेल्या मदतीमुळे आज २.७५ कोटी रुपयांचे साहित्य हिंगोली लोकसभा मतदार संघातील लाभार्थ्यांना मिळत आहे. त्यासाठी त्यांनी चाकोरी सोडून केलेली मदत कधीच विसरता येणार नाही. पक्षीय भेद बाजूला सारून त्यांनी ही मदत केली. १५ हजार लोकांच्या तपासण्या करून त्यांना नंतर साहित्य देणे ही काही सोपी बाब नाही. मात्र एलिम्कोच्या अधिकाऱ्यांनी हे शक्य केले. खेड्यापाड्यातील ज्या दिव्यांगांना बाहेरही पडता येणे शक्य नाही, त्यांना या साहित्याची मोठी मदत होणार आहे. अंध, कर्णबधिर, हात, पायाने अधू अशा विविध प्रकारच्या लाभार्थ्यांना अत्याधुनिक साहित्य दिले जाणार आहे. सायकल, बॅटरीवरील सायकल, कुबड्या, वॉकर, कर्णयंत्र, ब्रेल लिपी कीट, मोबाईल आदी साहित्याचा यात समावेश आहे.

यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे म्हणाले, सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने देशभरात केली जात असलेली ही मदत दिव्यांगांना सामर्थ्य देणारी आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यालाही आठवले यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानायला पाहिजे. भविष्यातही अशाच मदतीची अपेक्षा आहे.

यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात काही लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले, तर कोरोनाच्या काळात एकाच ठिकाणी मोठी गर्दी होऊ नये, यासाठी उर्वरित लाभार्थ्यांना हे साहित्य पंचायत समित्यांमार्फत घरपोच दिले जाणार आहे. ग्रामसेवकांमार्फत त्यांचे वाटप होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सूत्रसंचालन संजय बोहरा यांनी केले. या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांसह इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.