शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

आमचे रक्त विकत घ्या, पण अन्नधान्य द्या! हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:48 IST

Hingoli News: सतत पीकहानी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण झालेल्या गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून अवयव विक्रीला काढण्यात आले आहेत.

गोरेगाव (जि. हिंगोली) :  सतत पीकहानी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण झालेल्या गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून अवयव विक्रीला काढण्यात आले आहेत. आता कुटुंब उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उपस्थित करत संबंधित शेतकऱ्यांनी ‘आमचे रक्त विकत घ्या  आणि बदल्यात पोट भरण्यासाठी गहू, तांदूळ, तेल अन्नधान्य द्या,’ अशी मागणी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे  सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. प्रचंड पीकहानी होऊनही  पीक विम्याचा एक रुपयाचाही परतावा मिळाला नाही. कुठलीच शासकीय  मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सरकारकडे रक्त काढून घ्या, पण अन्नधान्य द्या, अशी मागणी  केली आहे.

वारंवार आंदोलने करूनही  शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर   अवयव, रक्त विक्रीची वेळ आली आहे.  - गजानन कावरखे,     शेतकरी, गोरेगाव, जि. हिंगोली

  परिणामी शेतकरी कंगाल झाला असल्याने आता परिवाराचा उदरनिर्वाह भागवायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. हा मुद्दा मांडत गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांकडून आता रक्त विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली