शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

काँग्रेसकडून तीन जिल्हा परिषद सदस्यांचा अपात्रतेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:18 IST

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या वेळी काँग्रेसमध्ये गटा-तटांप्रमाणेच फूट पडली होती.

ठळक मुद्देगोंधळानंतर काँग्रेसकडून कार्यवाही जिल्हा कचेरीत प्रस्ताव दाखल

हिंगोली : जिल्हा परिषदेत रोज नव्या वादांना तोंड फुटू लागले आहे. दोनच दिवसांपूर्वी विषय समित्यांचे खातेवाटप करण्याच्या सभेत झालेल्या गोंधळानंतर आता काँग्रेसच्या वतीने माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर गटाच्या तीन सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हा कचेरीत दाखल केला आहे. यावर अजून पुढील प्रक्रियेला प्रारंभ झाला नसला तरीही ही बाब आता चर्चेचा विषय ठरत आहे.

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या वेळी काँग्रेसमध्ये गटा-तटांप्रमाणेच फूट पडली होती. माजी खा.राजीव सातव यांचा सात जणांचा गट वेगळा तर माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा तीन जणांचा गट वेगळा राहिला. यात सातव गटाच्या मंडळीला बाजूला सारून शिवसेनेने गोरेगावकर गटाला एक सभापतीपद देत सर्व बाबी आपल्या मनासारख्या करून घेण्यात यश मिळविले आहे. गोरेगावकर गटाचे बाजीराव जुंबडे यांना सभापतीपद मिळाले आहे. आता जुंबडे यांनी शिक्षण पदावर दावा केला असला तरीही तेथे काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेतील असंतुष्टांनी राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण यांच्या पाठीशी बळ उभे केले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी सभा तहकूब करावी लागली होती. त्यामुळे माजी खा.सातव यांच्या गटाचा विरोध स्पष्ट दिसत होता.

आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या सूचनेवरून सभापती बाजीराव जुंबडे, माजी सभापती संजय देशमुख व चंद्रभागा देवराव जाधव या तीन सदस्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नसल्याच्या कारणावरून त्यांना अपात्र घोषित करण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला आहे.या प्रस्तावावर आता पुढील कारवाई काय होईल ते सुनावनीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी महसूल क्रीडा स्पर्धांमुळे हे प्रकरण लवकर सुनावणीला येईल, अशी शक्यताही दिसत नाही. मात्र या प्रकाराची चर्चा तेवढी रंगणार असल्याचे दिसते.

जिल्हा परिषदेत एकच चर्चाजिल्हा परिषदेतील वितंडवाद सुरू असले तरीही त्यावरील चर्चाही मात्र तेवढीच सामंजस्याने होते. सभागृहात एकमेकांना विरोध करणारी मंडळी सभागृहाबाहेरील चर्चेत मात्र तेवढीच खिलाडीवृत्ती ठेवून व दिलखुलासपणे चर्चेत सहभागी होताना दिसते.४मागील दोन दिवसांपासून जि.प.तील तिढा कसा सुटणार व कोण सोडविणार, यावरुन चर्चा रंगत आहे. मात्र तोपर्यंत बिनखात्याचे सभापती अन् वादाला फोडणी देणारी बाहेरची मंडळी सर्वांचीच अस्वस्थता वाढवून जात असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषदcongressकाँग्रेस