शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

गर्दी कराल, तर खबरदार! पथसंचलनातून पोलिसांचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:23 AM

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अतिशय नुकसानकारक ठरली. मृत्यूचे दिवसागणिक येणारे आकडे डोळ्यात पाणी आणायला लावणारे आहेत. आता ही ...

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अतिशय नुकसानकारक ठरली. मृत्यूचे दिवसागणिक येणारे आकडे डोळ्यात पाणी आणायला लावणारे आहेत. आता ही लाट ओसरत चालली. मात्र त्यामुळे बिनधास्तपणाही वाढत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी नागरिकांनी स्वत:च आपल्या आरोग्याची काळजी घेऊन नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेत एवढी तुफान गर्दी होती की, कोरोनाचा कहर संपला की काय? असे चित्र होते. याबाबत माध्यमांतूनही टीका झाली. त्यानंतर जागे झालेले पोलीस प्रशासन आज रस्त्यावर उतरले. मात्र आधी सबुरीने पथसंचलनातून जो संदेश द्यायचा तो दिला आहे. भविष्यात कडक पावले उचलण्याची वेळ येणार नाही, यासाठी ही सौम्य तंबी दिल्याचे दिसत आहे. मात्र यातून नागरिक किती बोध घेतात, हे आगामी काळातच कळणार आहे.

या पथसंचलनामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे आदींची उपस्थिती होती; तर मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.

हिंगोली शहरातील बाजारपेठेत गर्दीला कोरोनाच्या नियमांची जाणीव करून देण्यासाठी पोलिसांना सक्त भूमिका घेण्याची वेळ न आलेलीच बरी, अशी सध्या स्थिती आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना पेरण्यांची लगबग राहणार असून, नाहक गर्दी करणाऱ्यांचा त्यांना फटका सोसावा लागण्याची भीती आहे. शिवाय पोलीस सक्तीने वागले, तर व्यापाऱ्यांनाही आपल्या व्यापारावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझर ही त्रिसूत्री काटेकोरपणे पाळण्याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे.