शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

पीकविम्याच्या रकमेतून होतेय कर्जकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:23 AM

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील खरीप हंगाम ऐनवेळी अतिवृष्टीने हिरावून नेला. त्यापूर्वीच्या वर्षीही असाच प्रकार घडला होता. आता पीकविम्याच्या ...

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील खरीप हंगाम ऐनवेळी अतिवृष्टीने हिरावून नेला. त्यापूर्वीच्या वर्षीही असाच प्रकार घडला होता. आता पीकविम्याच्या मंजूर रकमेतूनही इतर कर्ज कापून घेतले जात असल्याने या हंगामाची पेरणी करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अशी कपात करू नये, अशी मागणी जि.प. सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जवळपास १.२१ लाख शेतकरी खातेदारांना यंदा पीकविमा मंजूर झाला आहे. पीकविम्याची रक्कम अजूनही पूर्णपणे खात्यावर पडली नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ६५ कोटी रुपये जमा झाले आहेत. टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जात आहे. यासाठी विमा कंपनीकडून अधिकचे मनुष्यबळ लावून ७ जूनपूर्वी सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न आहे. मात्र तत्पूर्वीच ज्यांची रक्कम जमा झाली त्यावर बँका थेट डल्ला मारत आहेत. ती रक्कम इतर कर्जाच्या नावाखाली जमा करून घेत आहेत. शेतकरी बँकेत पैसे काढायला गेल्यावर ही कारणमीमांसा सांगितली जात आहे. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येणार आहे. कारण नवीन कर्ज देण्यासाठीही बँकांची भूमिका उदासीन आहे. शेतकऱ्यांचा राष्ट्रीयीकृत बँकांनी तर पुरता छळ चालविला आहे. या बँकांवर कुणाचेही नियंत्रण न राहिल्याने त्यांचे फावतच आहे.

याबाबत डॉ. पाचपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बँकांनी इतर कर्जात पीकविम्याची रक्कम वळती करू नये, अशी मागणी केली आहे.