शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हिंगोलीत विजयी व पराभूत उमेदवारांत फरक अवघा 0.१६ टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:20 IST

फरकापेक्षा दहापट मते इतरांना

- विजय पाटील, हिंगोली

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी व पराभूत उमेदवारांतील मतांमध्ये फरक केवळ 0.१६ टक्क्याचा होता. सर्वात कमी फरकाने निवडून आलेली महाराष्ट्रातील ही जागा ठरली. त्यावेळी रिंगणात असलेल्या इतर २१ उमेदवारांनी ११.२३ टक्के मते मिळविली होती. 

मागच्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराने मिळविलेली मते लक्षणीय होती. भारिप या निवडणुकीत ९५७७ मते मिळवत बहुजन मुक्तीच्याही मागे पडली. त्यामुळे काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसला या धर्मनिरपेक्ष मतांमध्ये होणाऱ्या विभाजनाचा नेहमी बसणारा फटका मागच्या वेळी बसला नाही. नामसाधर्म्याच्या उमेदवारांचाही सातव यांच्यापेक्षा सुभाष वानखेडे यांनाच जास्त फटका बसला होता. वानखेडे नावाच्या दोघांनी बारा हजारांपेक्षा जास्त मते मिळविली होती. त्यामुळे एकेका मतासाठी झगडणाऱ्या प्रमुख उमेदवारांना मागच्या वेळी अपक्ष व इतर पक्षीय उमेदवारांनी चांगलेच अडचणीत आणले होते. 

सातव यांचा नवा चेहरा, राष्ट्रीय पातळीवर काम करताना विकासाची अपेक्षा, काँग्रेस नेतृत्वाशी असलेली जवळीकता अशा कारणांनी त्यांनी मतदारांवरही छाप पाडली होती. त्यामुळे मतविभाजन, इतर उमेदवारांनी घेतलेली ११ टक्के मते या सर्व बाबींवर मात करून त्यांनी विजयश्री खेचली होती.

44.46 टक्के मते सातवांना मागच्या लोकसभेला मोदी लाट असतानाही येथे काँग्रेसचे राजीव सातव यांनी काट्याची टक्कर दिली. काँग्रेसचे राजीव सातव यांना ४ लाख ६७ हजार ३९७ म्हणजे ४४.४६ टक्के तर शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांना ४ लाख ६५ हजार ७६५ म्हणजे ४४.३१ टक्के मते मिळाली होती. दोघांतील फरक अवघा १६३२ मतांचा होता.

25000 मते बसपाला १ लाख १८ हजार ३१५ मते उर्वरित २१ उमेदवारांनी घेतली होती. नंतरची सर्वाधिक बसपाचे चुन्नीलाल जाधव यांना २५ हजार १४५ म्हणजे २.३९ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर माकपचे डी.बी.नाईक यांना १४ हजार ९८६ मते मिळाली. हे प्रमाण १.४३ टक्का होते.  बहुजन मुक्ती पार्टीचे उत्तमराव राठोड यांनी ९७७0 मते म्हणजे 0.९३ टक्का मते घेतली होती. इतर १८ उमेदवारांनी ६८ हजार १0१ म्हणजे ६.४८ टक्के मते मिळविली होती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhingoli-pcहिंगोलीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस