शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

तंटामुक्त गाव योजनेला लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:22 AM

शेवाळा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव याेजनेच्या माध्यमातून गावस्तरावरच तंटे साेडवित गावात सलाेख्याचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. ...

शेवाळा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव याेजनेच्या माध्यमातून गावस्तरावरच तंटे साेडवित गावात सलाेख्याचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, माेहिमेच्या तेराव्या वर्षांत या याेजनेला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.

गावातील लहान तंटे गावातच मिटवून गावकऱ्यांचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून १५ ऑगस्ट २००७ पासून राज्यात कार्यान्वित असलेल्या या बहुआगामी योजनेला युती सरकारमध्ये घरघर लागली होती. परंतु, महाविकास आघाडीत तरी या योजनेला नवसंजीवनी मिळण्याच्या प्रतीक्षेतील ही योजना गावखेड्यापासून दूर होत चालली आहे. यामुळे गावागावांत तंटमुक्ती समित्यांची नीट बसलेली घडी विस्कळीत झाली आहे. मध्यंतरीच्या काळात गाव समिती अध्यक्षपदासाठी राजकीय रस्सीखेचही अनेक ठिकाणी पहावयास मिळाली. विशेष म्हणजे, गृह विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्याच वाट्याला आल्याने मरगळलेल्या या योजनेला चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र, तसे होताना दिसत नाही. परिणामी, मार्गदर्शनाचा अभाव व राजकारणाचा शिरकाव यामुळे पुढील वर्षात मोहिमेचे विसर्जन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील दहा वर्षांच्या काळात गृहविभागाने एकही नवीन परिपत्रक या योजनेची कार्यक्षमता वाढविण्याबाबत काढले नाही, हे विशेष. तसेच पुरस्कारही रखडले आहेत. पुरस्कार रकमेच्या विनियोगातून पुरस्कारप्राप्त गावांनी विविध विकासकामेही केली. परंतु, कामातील सातत्य जास्त काळ टिकले नाही. अनेक गावात तंटामुक्त मोहिमेने सुरुवातीचे पाच वर्षे वगळता नंतर नांगी टाकली आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील लहान वादविवाद आता पुन्हा पोलीस ठाणे गाठत आहे. आता या योजनेकडे झालेले दुर्लक्ष पुन्हा एकदा लहान - मोठ्या तंट्यांना जन्म देत आहेत. गावात या तंट्यांना सोडविण्यात येत नसल्याने आता पुन्हा नागरिक पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत. ग्रामीण भागात गावगावांत भांडणतंटेही वाढत आहेत. त्यामुळे या योजनेला पुन्हा एकदा सक्रिय करणे गरजेचे झाले आहे.