शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

अवकाळी पावसामुळे ‘पूर्णे’च्या साखरेचा झाला पाक; गोडाऊनमध्ये पाणीच पाणी, २ कोटींचे नुकसान

By विजय पाटील | Published: November 28, 2023 7:28 PM

गोडाऊनमध्ये सर्वत्र पाणीच पाणी, अवकाळी पावसामुळे कारखान्याचे गाळप थांबवावे लागले आहे.

हिंगोली : रविवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे  जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील साखरेची पोती पाण्याखाली आली. त्यामुळे साखरेचे तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले.

वसमत तालुक्यात २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेदरम्यान अचानक जोरदार पाऊस झाला. यावेळी अवकाळी मुसळधार पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यापाठोपाठ कापूस, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. अवकाळी पावसाने साखरेच्या गोडाऊनमधील अंदाजे ५०० मे.टनाच्या जवळपास साखर भिजली आहे. पाऊस सुरू झाला तेव्हा गोडाऊनमध्ये पाणी साचेल असे वाटले नव्हते; परंतु जोराचा पाऊस असल्यामुळे गोडाऊनमध्ये पाणीच पाणी झाले. अवकाळी पावसामुळे कारखान्यात मोठे नुकसान झाले.

गाळप पूर्ववत चालू करण्यासाठी अंदाजे २४ तास लागले आहे. अवकाळी पावसामुळे कारखान्याचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली. अवकाळी पावसामुळे कारखान्याचे गाळप थांबवावे लागले आहे. पुढील चार ते पाच दिवस कारखाना पूर्ण गाळप क्षमतेने चालविण्यास अडचण येणार आहे. ज्या गतीने ऊसतोडणी होत होती ती अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी थांबली असल्याने कारखान्याचे गाळप काही दिवस थांबणार असल्याचे सांगण्यात आले. साखर ज्या गोडाऊनमध्ये ठेवली आहे त्या गोडाऊनमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे साखर पाण्यात भिजली गेली आहे.

गोडाऊनमध्ये सर्वत्र पाणीच पाणी...अवकाळी पावसामुळे कारखान्याच्या गोडाऊनमध्ये असलेली साखरेची पोती भिजली गेली. यामध्ये ५०० मेट्रिक टन साखर होती. या अवकाळी पावसामुळे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.- सुनील दळवी, कार्यकारी संचालक, ‘पूर्णा’ कारखाना

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीSugar factoryसाखर कारखाने