शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

अवयव विक्रीस काढूनही दखल नाही; गोरेगावचे शेतकरी आता करणार ‘अन्नत्याग’ आंदोलन

By विजय पाटील | Published: December 07, 2023 4:42 PM

मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून सरसकट कर्जमाफीची केली मागणी

हिंगोली : बँक कर्ज परतफेडीसाठी किडनी, डोळे, लिव्हर, विक्रीला काढूनही शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता परंत मुंबईहून परतलेल्या त्या शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी करीत अन्नत्याग आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सेनगाव तालुक्यातील गोेरेगाव व परिसरात यंदा खरीप हंगामात पावसाचा खंड व ‘येलो मोझॅक’ सारख्या रोगामुळे पिकांचे प्रंचड नुकसान झाले. परिणामी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात उत्पन्न घट झाली. परंतु कुठल्याही प्रकारची सरकारी मदत किंवा पिकविमा परताव्याचा लाभ मिळाला नाही. त्यात सोयाबीन व कापूस पिकाला योग्य भावही मिळत नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर बँक कर्ज फेडायचे कसे ? असा प्रश्न उभा राहिला आहे. यास कंटाळून गोरेगावसह परिसरातील दहा शेतकऱ्यांकडून अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. गत महिन्यात अवयव विक्री आंदोलनासाठी संबंधित शेतकऱ्यांनी मुंबई गाठली होती. दरम्यान त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या निमंत्रित करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

७ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. यामध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी ८ डिसेंबरपासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सदर निवेदनावर गजानन कावरखे, रामेश्वर कवरखे, मदन कावरखे, सुनील मधुरवाड, संजय मुळे, अक्षय पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अवयव विक्रीवरही ठाम ...सततच्या दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात होरपळला जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्याच्या घटना घडत आहेत. बिकट परिस्थिती बघता शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे. पिकविमा, शेतमाला योग्य भाव तसेच सरसकट कर्जमाफी आदी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल. बँक कर्ज परतफेडीसाठी अवयव विक्रीवरही आम्ही ठाम असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी