शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

शेतकऱ्यांचा टाहो ! पूर्णा प्रकल्पाचे पाणी कोणी तरी वाचवा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 6:50 PM

 वाया जाणाऱ्या पाण्याने उलट नुकसानीच्या झळा

ठळक मुद्देदरवाजांना पैसे देण्याची शेतकऱ्यांची तयारीसहा महिन्यांतच दोन्ही धरणे रिकामी होण्यास वेळ लागणार नाही. 

- चंद्रकांत देवणे 

वसमत : पूर्णा प्रकल्पाच्या दुसऱ्या पाणीपाळीतही प्रचंड प्रमाणात पाणी वाया जात आहे. मायनरला दरवाजे न बसवताच पाणीपाळ्या देवून अधिकारी, कर्मचारी नांदेडला खुशाल राहत असल्याने पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. पाच वर्षांत पाणी पाणी करत प्रचंड होरपळल्यानंतर आता असे पाणी वाया जात असल्याचे पाहून कोणी तरी पाणी वाचवा हो, असा आक्रोश शेतकरी करत आहेत. 

पूर्णा पाटबंधारेच्या पाण्यावर वसमतसह नांदेड, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तहानभूक अवलंबून आहे. तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा धरण भरल्याने आता किमान तीन वर्षे तरी पाणी कमी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त होत होता.मात्र आता तर विचित्र चित्र समोर येत आहे. गेल्या पाच- सात वर्षांत कालवे-चाऱ्यांतून पाणी वाहिले नसल्याने चाऱ्या, मायनर गाळ व काटेरी झुडपे, गवताने भरून गेल्या आहेत. काही मायनर जमीनदोस्त झाले आहेत. आता पाणी पाळी देण्यापूर्वी ही सर्व मायनर, वितरिका, चाऱ्यांची दुरूस्ती करूनच पाणी सोडणे अपेक्षित होते. मात्र पूर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन व बेपर्वा वृत्तीमुळे कागदावरच मायनर साफ झाली. पाणीपाळी दिल्यानंतर नियोजनानुसार प्रत्येक मायनरवरून वितरिकेद्वारे शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याची जवाबदारी असते. मात्र यावेळी पाणी नियोजन काय असते? हेच माहिती नसल्यासारखी अवस्था आहे. सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडले ते वाट फुटेल तसे वाहत आहे. मायनरला दरवाजेच नाहीत. त्यामुळे मुख्य कालव्यांवर असलेल्या मायनरमधून थेट चाऱ्यांमध्ये व चाऱ्या गाळांनी भरलेल्या असल्याने थेट रस्त्यावर पाणी असे चित्र आहे. 

१५ ते २० दिवसांची पाणीपाळी देण्यात येत आहे. हे २० दिवसही पाणी नको असेल तरी शेतापर्यंत पोहोचत आहे. चाऱ्या फोडून रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. बीबीसी कालव्यावर असलेल्या जवळा मायनरला दरवाजे भसल्याने पहिल्या पाळीमधील पाण्याची प्रचंड नासाडी झाली.आता तिसऱ्यांदा पाणी आले तरीही दरवाजे नसल्याने पाणी अखंडपणे वाया जाणे सुरूच आहे. पाणी मागणी अर्ज नाहीत, शेतकऱ्यांकडून मागणी नाही. सध्या पाण्याची आवश्यकता नाही तरीसुद्धा पाणीपाळी देण्यामागचा हेतूच समजत नाही. 

आजपर्यंत पाण्याअभावी होरपळल्या गेले व आता पाणी वाया जात असल्याचे पाहून शेतकरी आचंबित आहेत. कोणी तरी पाणी वाचवा हो, असा धावा करत आहेत. मात्र पूर्णा प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी व अभियंते नांदेडहून कारभार पाहत असल्याने वाया जाणारे पाणी पाहत हळहळ व्यक्त करण्याशिवाय पर्याय नाही. कागदावर कालवे स्वच्छ करण्यात कोणाला किती लाभ झाला, शासनाच्या तिजोरीला किती चुना लागला याचा हिशोब चौकशी झाल्यावर लागेल मात्र वाया गेलेले पाणी पुन्हा परत येणार नाही. त्यामुळे दरवाजे बसवा मगच पाणी सोडा, अशी मागणी होत आहे. असेच पाणी वाया जात राहीले तर सहा महिन्यांतच दोन्ही धरणे रिकामी होण्यास वेळ लागणार नाही. 

दरवाजांना पैसे देण्याची शेतकऱ्यांची तयारीमायनरला दरवाजे बसविण्यासाठी पूर्णा प्रकल्पाकडे पैसे नसतील तर जवळा मायनरला दरवाजा बसवण्यासाठी स्वत: खर्च करण्याची तयारी शेतकरी सुभाष भोपाळे यांनी दर्शविली. दरवाजा बसवा खर्च देतो, असा निरोप शाखा अभियंत्यांनाही दिला. तरीही तिसऱ्या पाळीला दरवाजा न बसवताच पाणी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ४शाखा अभियंता पठाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की , मायनरला दरवाजे नाहीत, हे सत्य आहे. दरवाजे नसल्याने पाणी वाया जात आहे, हेसुद्धा खरे आहे. मात्र मागणी करूनही दरवाजे बसवलेले नाहीत. त्यामुळे अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी वाया जात आहे हे मान्य करणारे दरवाजे न बसवता पाणी का सोडत आहेत, हे कोडे आहे. 

टॅग्स :WaterपाणीHingoliहिंगोलीFarmerशेतकरीagricultureशेती