शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

शेतकरी घालणार राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू आहे अन्नत्याग आंदोलन

By विजय पाटील | Published: December 09, 2023 4:51 PM

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे  शेतीमालाला शासन योग्य भाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ

हिंगोली: महाराष्ट्रातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडला असून कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे परंतु शासनाला मात्र शेतकऱ्यांची कीव येत नाही. यासाठी तर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. अन्नत्याग आंदोलनाची दखल शासनाने घेतली नसल्यामुळे रविवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी बांधव राज्य शासनाचे श्राद्ध घालणार आहेत.

गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर गजानन कावरखे , संजय मुळे , रामेश्वर कावरखे , मदन कावरखे , अक्षय पाटील सुनील मधुरवाड आदी शेतकऱ्यांनी  मागणीसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणी साठी अन्नत्याग आंदोलन ८ डिसेंबर पासून सुरू केले आहे. दरम्यान गोरेगाव सह परिसरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा दिला जात असून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जात आहेत.

गत चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी तर पाऊस कमी झाला दुसरीकडे विविध रोगांमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाला आणि सोयाबीन हातचे गेले. कापूस तुरीचीही तीच अवस्था आज जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खरीप हंगामाने साथ सोडली असली तरी रब्बी हंगामात शासन शेतकऱ्यांना मदत करेल, शेतमालाला योग्य भाव देईल असे वाटले होते. परंतु, शासन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे. शेतकरी सध्या कर्जबाजारी झाला असून बँकेचे कर्ज कसे फेडावे या अभी वंचित आहे. शेतकरी जगला तर देश जगेल असे शासन करते म्हणत असले तरी शेतकऱ्यांना शासनाचा कवडीचाही आधार राहिला नाही उलट आंदोलन करत्या शेतकऱ्यांवर शासन गुन्हे दाखल करत आहे. एवढेच काय आंदोलन करू नका, असेही सांगत आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे  शेतीमालाला शासन योग्य भाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे मागच्या दोन आठवड्यांपूर्वी गोरेगाव व परिसरातील सात ते आठ शेतकरी अवयव विक्रीसाठी मुंबई येथे गेले होते परंतु शासनाने मुंबई येथे गेलेल्या शेतकऱ्यांवर दडपशाही करत त्यांचे आंदोलन मोडीत काढले यापुढे जर आंदोलन केले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असाही इशारा यावेळी शासनकर्त्यांनी दिला पोलीस बाळाचा वापर वारंवार हे सरकार करत आहे अशावेळी शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय राहिला नाही. आत्महत्या रोखायचे असतील तर शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून महाराष्ट्र कर्जमुक्त करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे.

रविवारी घातली जाणार शासनाचे श्राद्ध...महाराष्ट्र तील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे यासाठी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे या मागणीसाठी आठ डिसेंबर पासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. दहा डिसेंबर रोजी अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे शासनाने या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला नाही तर सकाळी ११ वाजता शासनाचे येतोचितपणे श्राद्ध घालण्यात येणार आहे.- गजानन कावरखे, गोरेगाव

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीState Governmentराज्य सरकार