शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'आम्हाला सुरक्षा द्या', हिंगोलीत नाथजोगी समाजाने मोर्चातून केली मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:49 IST

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकाळी १०.३० वाजता नाथजोगी समाजाचा मोर्चा हिंगोली जिल्हाकचेरीवर धडकला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील भटक्या जमातीतील नाथजोगी, डवरी, नाथपंथी, गोसावी समाजबांधवांनी सकाळी १0.३0 च्या सुमारास गांधी चौक येथून हा मोर्चा काढला. मोर्चात महिला, पुरूष व तरूणांची मोठी गर्दी होती

हिंगोली : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकाळी १०.३० वाजता नाथजोगी समाजाचा मोर्चा हिंगोली जिल्हाकचेरीवर धडकला. भटक्या जमातीतील व्यक्तीवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत, त्यामुळे समाजाच्या सुरक्षा द्यावी,तसेच राईनपाडा घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

जिल्ह्यातील भटक्या जमातीतील नाथजोगी, डवरी, नाथपंथी, गोसावी समाजबांधवांनी सकाळी १0.३0 च्या सुमारास गांधी चौक येथून हा मोर्चा काढला. इंदिरा गांधी चौक, अग्रसेन चौक मार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात महिला, पुरूष व तरूणांची मोठी गर्दी होती. शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प होती. 

मुले पळवून नेणाऱ्या टोळीतील समजून भटक्या जमातीतील पाच जणांची हत्या केल्याची घटना धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे घडली होती. राज्यात अशा घटना वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे या समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटकंती करत भिक्षा मागून पोट भरणे हे एकमेव उपजीविकेचे साधन असल्याने शासनाने भटक्या समाजबांधवांना न्याय द्यावा. भिक्षा मागण्यासाठी गावो-गाव फिरणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने ओळखपत्र द्यावीत. धुळे जिल्ह्यातील हत्येच्या घटनेतील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच मृत्यू झालेल्या कुटुंबियांना शासनाने तत्काळ मदत द्यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, युवासेनेचे दिलीप घुगे, राम कदम यांच्यासह भटक्या विमुक्त विकास परिषद संचलित नाथजोगी विकास सेवा संस्था अध्यक्ष नारायण बाबर, सिद्धूनाथ शिंदे, आप्पा काशीराम शिंदे आदींचा सहभाग होता. 

टॅग्स :Child Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीMorchaमोर्चा