शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अहो सरकार! तुम्हीच सांगा, पाचशे-हजार रुपयांत कसे जगायचे? ईपीएस ९५ पेन्शनधारकांची व्यथा

By रमेश वाबळे | Updated: March 11, 2024 19:33 IST

सहकार खाते, राज्य विद्युत मंडळ, एसटी महामंडळ, साखर कारखाने, बिडी कामगार यासह विविध महामंडळांत सेवा बजावलेल्या पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन मिळते.

हिंगोली : एकीकडे महागाईने कळस गाठला असताना ईपीएस ९५ पेन्शनधारकांना मात्र ५०० ते २ हजार २०० रुपये पेन्शन मिळते. या तुटपुंजा पेन्शनमध्ये जीवन जगणे अवघड झाले असून, सरकारने पेन्शनवाढ करावी, या मागणीसाठी ११ मार्च रोजी ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

सहकार खाते, राज्य विद्युत मंडळ, एसटी महामंडळ, साखर कारखाने, बिडी कामगार यासह विविध महामंडळांत सेवा बजावलेल्या पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन मिळते. महागाईच्या काळात हाती येणाऱ्या पेन्शनवर जीवन जगणे शक्य होत नाही. त्यामुळे उतारवयात काम करण्याची वेळ पेन्शनधारकांवर आली आहे. सध्या पेन्शनधारकांना ५०० रुपये, ७०० रुपये, ९०० रुपये ते २ हजार २०० रुपये एवढी पेन्शन मिळते. पेन्शनवाढ मिळावी, यासाठी पेन्शनर्सच्या वतीने अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. दिल्लीतही शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रश्न मांडला.

परंतु, पेन्शनवाढीचा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे पेन्शनधारकांत नाराजीचा सूर उमटत असून, लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर पेन्शनवाढ करावी, मागणीसाठी ईपीएस ९५ पेन्शनधारकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांना देण्यात आले. यावेळी मारोजी चव्हाण, सुभाष अपूर्वा, जेजेराम ढोक, महंमद गौस, ए. डी. पाईकराव, पी. आर. कोटकर, डी. पी. नरवाडे, गफार खान, आर. बी. अंभोरे, भीमराव मार्कड, शेख रसूल, समीउल्लाखाँ, एस. के. काशिदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Hingoliहिंगोली