शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

हिंगोलीत वाळूघाट लिलावाला पुन्हा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 1:17 AM

मागील दोन वर्षांत वाळू घाट लिलाव होत नसल्याने यंदा तरी वाळूघाटाचे लिलाव होतील, अशी अपेक्षा होती. मात्र एका न्यायालय याचिकेनंतर घाट लिलावाची प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे.

ठळक मुद्दे २६ घाटांसाठी सुरू होती प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन वर्षांत वाळू घाट लिलाव होत नसल्याने यंदा तरी वाळूघाटाचे लिलाव होतील, अशी अपेक्षा होती. मात्र एका न्यायालय याचिकेनंतर घाट लिलावाची प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे. २६ घाटांच्या लिलावासाठी जिल्हा कचेरीतील गौण खनिज विभागाने तयारी पूर्ण केली होती.मागील दोन वर्षांत वाळू घाट लिलावात जात नसल्याने मोठी बोंब होत होती. वाळूघाटांचे दर लिलावातील स्पर्धेत वाढले. आता ते दर परवडत नसल्याचे सांगून कंत्राटदार लिलावाकडे कानाडोळा करीत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शासनास प्रस्ताव पाठवून दर कमी करण्याची मागणी केली होती. जवळपास १२ रुपये प्रतिब्रास एवढे दर खाली आले आहेत. मात्र लिलावात स्पर्धा झाल्यास ते वाढण्याचीही भीती आहे. आता पुन्हा बांधकामांचा हंगाम सुरू होण्याची वेळ आली असली तरीही घाटच बंद असल्याने वाळू मिळत नाही. काही ठिकाणचे साठे विकल्यानंतर आता कुठेच वाळू शिल्लक नाही. त्यामुळे बांधकामे ठप्प आहेत. वाळू घाटांचे लिलाव करण्याची मागणी करणारी निवेदने प्रशासनाला दिली जात आहेत. हिंगोली, कळमनुरीत काही कारागिरांनी निवेदने दिली होती. यंदा वाळूघाट लिलावाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झालीही होती. मात्र नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेनंतर ती ठप्प झाली. उलट लिलाव झाला असल्यास ते घाटही शासनाच्या ताब्यात घेण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे यंदाही वाळूघाट लिलाव न झाल्यास कारागिरांवर उपासमार कायम राहणार आहे. सध्या काही भागात चोरटी वाहतूक होत आहे. मात्र या वाळूचे दर सामान्यांना न परवडणारे आहेत. ही वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात काही जणांनी तर तलाठ्यावरच जीवघेणा हल्ला केला आहे. औंढा पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल झाला.वाळू घाटांचा लिलाव न झाल्यास कामगारांचे स्थलांतरयंदा सर्वच घाटांच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण २८ हजार वाळू सर्व घाटांतून उपलब्ध होणार आहे. कंत्राटदारांमध्ये जीवघेणी स्पर्धा न लागल्यास सामान्यांना आवाक्यातील दर मिळू शकतील. मात्र त्यांच्यातील नाहक स्पर्धेत सामान्यांना फटका बसत आहे. ३५ ते ४0 हजार रुपयांत टिप्पर हा दर देवून वाळू विकत घेणे म्हणजे सोन्याचाच भाव देण्यासारखे घडत आहे. यंदा दुष्काळामुळे बांधकामांकडे आधीच तेवढा कल नाही. त्यात वाळू घाट लिलावही न झाल्यास बांधकाम कारागिरांना मात्र स्थलांतराशिवाय कोणताच पर्याय दिसत नाही.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीsandवाळूCourtन्यायालय