शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हिंगोलीत शेतकरी आणि सुरक्षा रक्षकाच्या वादातून मोंढ्यात गोंधळ; संचालकांची ठाण्यात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:10 IST

गोंधळानंतर मोंढ्याचे गेट बंद केल्याने जवळपास २५० ते ३०० वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. 

ठळक मुद्देबाजार समितीने वाहनचालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता २७ मे पासून वाहनांसाठी टोकन पद्धत सुरु केली.माहिती नसलेल्या अर्ध्यावर वाहनचालकांना टोकनच मिळाले नाही.

हिंगोली : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या हळद मोंढ्यात सोमवारी (दि. २७) सकाळी ७ वाजेच्या दरम्यान वाहने गेटमध्ये सोडण्याच्या कारणावरुन सुरक्षारक्षक आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. त्यामुळे गोंधळ झाल्याने मोंढ्याचे गेट बंद केल्याने जवळपास २५० ते ३०० वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. 

बाजार समितीने वाहनचालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता २७ मे पासून वाहनांसाठी टोकन पद्धत सुरु केली. याची माहिती नसलेल्या अर्ध्यावर वाहनचालकांना टोकनच मिळाले नाही. सकाळी सुरक्षारक्षकाने काही टोकण नसलेल्या वाहनांना आत सोडले. तर अनेक वाहनांना गेटवरच अडवून ठेवले. काही वाहनांनी मोंढ्यात जाण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षकाने वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप हळद घेऊन आलेले वाहनचालक वैजनाथ पठाडे, गजानन शिंदे, कैलास विश्वनाथ सावळे, सुभाष सावळे यांनी केला. या प्रकारामुळे संतप्त शेतकरी व वाहनचालकांनी बाजार समितीचे गेट बंद करुन आंदोलन केले. 

बाजार समितीचे संचालक महासेन प्रधान यांनी सकाळी ७ वाजता हिंगोली शहर पोलीस ठाण्यात संपर्क करुन पोलीस कर्मचारी पाठविण्याची मागणी केली मात्र ठाण्यात सकाळी एकच कर्मचारी हजर असल्याने बंदोबस्त मिळू शकला नाही. ठाण्यातील कर्तव्यावर हजर असलेल्या एका कर्मचाऱ्याने इतर कर्मचाऱ्याने फोन करुन ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर १० वाजेदरम्यान पोलीस मोंढ्यात दाखल झाले. पोलीस व बाजार समितीचे संचालक प्रधान यांनी शेतकरी व चालकांची समजूत काढल्यानंतर प्रकरण शांत झाले. त्यानंतर पोलिसांनी वाहनांना मध्ये सोडले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्डHingoliहिंगोली