शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

हिंगोलीतील गोरेगावात शेतकऱ्यांनी घातले राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 2:34 PM

‘अन्नत्याग’ आंदोलनाच्या तिसरा दिवस

हिंगोली  : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असून,  सरकार मात्र सदर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नाही. मध्यंतरी बँककर्ज परतफेडीसाठी अवयव विक्रीचा पवित्रा घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, १० डिसेंबर रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राज्य शासनाचे श्राद्ध घालीत निषेध नोंदविण्यात आला आहे.

गत चार ते पाच वर्षापासून सततच्या दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागत असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी कर्जबाजारीपणाला कंटाळत शेतकरी आत्महत्याच्या घटनाही घडत आहेत. यंदा खरीप हंगामात उत्पन्न घटीचा फटका बसला असताना पिकविमा किंवा कुठलीच शासकीय अनुदान मदतही मिळाली नाही. शेतमालाला योग्य भावही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. आमची किडनी लिव्हर, डोळे आदी अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करीत आंदोलनासाठी मुंबई गाठली होती. परंतु शासनाकडून दखल घेण्यात आली नाही.

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर ८ डिसेंबरपासून कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन सुरु आहे. दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांसह गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून पाठिंबा दिला जात असून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने केली जात आहेत. रस्त्यावर दूध सांडून शासनाचा निषेध नोंदवित अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली. १० डिसेंबर रोजी येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता.  प्रतिमेसमोर अगरबत्ती, कापूर, मेणबत्ती दिवे जाळीत नैवेद्य फळांचा भोग चढवीत आंदोलक शेतकऱ्यांकडून राज्य शासनाचे श्राद्ध घालण्यात आले. प्रसंगी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, मदन कावरखे, अक्षय पाटील, सुनील मधुरवाड, रामेश्वर कावरखे, संजय मुळे आदीसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

सरकार संवेदनशील नाही ...

सतत दुष्काळ, उत्पन्नघटीचा सामना करावा लागत असताना आर्थिक विवंचणेत सापडलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना आत्महत्याचा पर्याय निवडावा लागत आहे. याबाबत अवयव विक्रीस काढूनही शासन दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्न बाबत सरकार जराही संवेदशील नाही. त्यामुळे राज्य सरकारचे श्राद्ध घालण्यात आल्याच्या प्रतिक्रिया यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHingoliहिंगोली