शहरं
Join us  
Trending Stories
1
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
2
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाला मविआला इशारा 
3
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
4
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
5
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
6
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
7
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
9
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
10
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
11
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
12
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
13
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
14
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
15
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
16
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
17
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
18
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
19
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
20
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!

हिंगोलीत राडा, शेतकऱ्यांनी फोडले पिकविमा कंपनीचे कार्यालय

By विजय पाटील | Published: October 13, 2022 2:42 PM

नुकसानीच्या बनावट सर्व्हेवरून शेतकरी संतापले

हिंगोली:  जिल्ह्यात आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या परस्परच नुकसानीचा सर्वे करून बनावट स्वाक्षऱ्याद्वारे पंचनामे सादर केले जात असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. आमदार संतोष बांगर यांनीही शेतकऱ्यांसमवेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

जिल्ह्यातील तीन लाख 48 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. शेतकऱ्यांचे 24 कोटी व शासनाचे मिळून 150 कोटींपेक्षा जास्त रक्कम पिक विमा कंपनीला प्रीमियम म्हणून मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पिक विमा कंपनीची टाळाटाळ असल्याचा प्रकार समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात न जाता थेट शेतकऱ्यांच्या बनावट सह्या करून पंचनामे केले जात आहेत. कृषी व महसुली विभागाचे संयुक्त पथक पाहणी साठी जात नाही. या सर्व तक्रारीनंतर आमदार संतोष बांगर यांनी कृषी व पिक विमा कंपनीची बैठक बोलावली होती. यात कृषी विभागाचे अधिकारी आले मात्र पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे संतप्त शेतकरी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात पिक विमा कंपनीचा कार्यालयावर धडकले काही शेतकऱ्यांनी संतापाच्या भरात कंपनीचे कार्यालय फोडले सर्व साहित्याची नासधूस केली.

कंपनीवर गुन्हा दाखल व्हावापिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बनावट सह्या करून फसवणूक केल्याने कृषी विभागामार्फत या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली. या ठिकाणी उपस्थित कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना गुन्हा दाखल करावा असे आदेशित केले.

शासनाचे पंचनामे ग्राह्य धरले पाहिजेआमदार संतोष बांगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही शेतकऱ्यांसह भेट घेतली. त्यांच्या कानावर घडला प्रकार घातला. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, या तक्रारी आमच्याही कानावर आले आहेत. याबाबत चौकशी लावली आहे संबंधितावर निश्चित कारवाई होईल. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतचे शासनाकडून करण्यात आलेले पंचनामे ग्राह्य धरण्यास कंपनीला भाग पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला जाईल.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी