शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
4
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
5
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
6
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
7
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
8
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
10
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
12
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
13
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
15
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
16
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
17
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
18
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
19
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
20
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य

आवक वाढल्याने भाजीपाला झाला स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:18 AM

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने विहिरी, तलावांना मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक वाढली आहे. शहरातील ...

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने विहिरी, तलावांना मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक वाढली आहे. शहरातील भाजी मंडईमध्ये भांडेगाव, वळद, समगा, माळेगाव, इंचा, केंद्रा, डिग्रस, सेनगाव, पळशी, जवळा, नरसी आदी गावांतील विक्रेते पालेभाज्या विक्रीसाठी आणतात. ठोक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना भाज्यांची विक्री केली जाते. मकर संक्रांत दोन दिवसांवर येवून ठेपली असल्याने भाजीपाला स्वस्त झाल्याने ग्राहकांत आनंद आहे.

मंडईमध्ये टोमॅटो १० रुपये किलो, पानकोबी १० रुपये किलो, फूलकोबी १० रुपये, काकडी २५ रुपये किलो, चवळी २५ रुपये किलो, गाजर ३० रुपये किलो, कांदा ४० रुपये किलो, कारले ४० रुपये, ढोबळी मिरची ३० रुपये किलोने विक्री झाली. दुसरीकडे मंडईत वांगी, हिरवी मिरची, शेवगा आदींची आवक कमी होती. वांगी ४० रुपये, हिरवी मिरची ५० रुपये तर शेवगा शेंगा १०० रुपये किलोने विक्री झाल्याचे पहावयास मिळाले.

मकर संक्रांती सणाला तीळगुळाचा मान असतो. त्यामुळे तीळ आणि गुळ महाग होऊन तेल स्वस्त होईल, असे वाटले होते. परंतु, शहरातील बाजारपेठेत गुळ ३५ रुपये किलो, तीळ १३० रुपये किलो तर साखर ३५ रुपये किलो दराने विक्री झाल्याचे विजय बगडीया यांनी सांगितले.

मागच्या आठवड्यापेक्षा यावेळेस डाळिंबची आवक फारच कमी आहे. डाळिंब १५० रुपये किलोने विक्री होत आहे. सफरचंद १०० रुपये, चिकू ६० रुपये, केळी ३० रुपये, अननस ८० रुपये, संत्रा ८० रुपये तर जांब ४० रुपये किलोने मंडईत विक्री झाल्याचे पहायला मिळाले.

नवीन वर्षात इतर वस्तू स्वस्त झाल्या असला तरी तेलाचे भाव मात्र वाढलेले पहायला मिळत आहेत. सोयाबीन १३० रुपये किलो तर सूर्यफूल तेल १४० रुपये किलोने विक्री झाल्याचे दिसून आले.

शहरातील मंडईमध्ये मकर संक्रांतीच्या तोंडावर शेवगा, वांगी, हिरवी मिरची वगळता सर्व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव उतरले आहेत.

-तानाजी शितुळे, भाजीविक्रेता, खरबी.

मकर संक्रांत दोन दिवसांवर येवून ठेपली आहे. संक्रांतीला पालेभाज्यांचे दर वाढतील असे वाटले होते. परंतु, पालेभाज्या स्वस्त दरात मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांत आनंद आहे.

-सीमा नागरे, हिंगोली

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फळांची आवक थोडी वाढली होती. यावेळेस सर्वच फळांची आवक कमी झाली आहे. डाळिंब १५० रुपयेकिलोने विक्री होत आहे.

-कयूम बागवान, फळविक्रेता, हिंगोली