शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

पाच महिन्यांमध्ये ८ गावांमध्ये पाणी नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:33 AM

हिंगोली : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत पाण्याची रासायनिक ...

हिंगोली : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत पाण्याची रासायनिक आणि जैविक तपासणी करण्यात आली. तपासणीअंती २१९ पाणी नमुने हे दूषित आढळून आले आहेत.

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत औंढा, वसमत, हिंगोली, कळमनुरी आणि सेनगाव येथे रासायनिक व जैविक तपसणीअंती घटकनिहाय दूृषित पाण्याचे नमुने तपासण्यात आले. टीडीएस या घटकांतर्गत २ हजारपेक्षा अधिक मात्रा असलेले पाणी नमुने १०, फ्लोराइड घटकांतर्गत ४५ पेक्षा अधिक मात्रा असलेले पाणी नमुने २९, नायट्रेट घटकांतर्गत ४५ पेक्षा अधिक पाणी नमुने ६०, आयर्न घटकांतर्गत १.० पेक्षा अधिक मात्रा असलेली पाणी २६ नमुने आढळून आले. पाणी नमुने दूषित आढळून आल्यास संबंधित पाचही तालुक्यांच्या गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचित करून यावर उपाययोजना करण्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात हिंगोली येथे एक मुख्य प्रयोगशाळा असून कळमनुरी, सेनगाव आणि वसमत येथे प्रत्येकी एक उपविभागीय प्रयोगशाळा आहे. नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरीज (एनएबीएल) या परीक्षणातून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचेही सहायक भूवैज्ञानिक मांजरमकर यांनी सांगितले.

पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात...

पाणी नमुन्यांची तपासणी जिल्ह्यात वर्षातून दोन वेळा केली जाते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या जल सुरक्षामार्फत पाण्याचे नमुने जिल्ह्यातील मुख्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यानंतर पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल दिला जातो. सदरील प्रयोगशाळेत खाजगी पाणी नमुन्यांचीही तपासणी करण्यात येते. नागरिकांनी प्रयोगशाळेत पाणी नमुने घेऊन यावेत.

- रवींद्र मांजरमकर, सहायक भूवैज्ञानिक