शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

जयप्रकाश मुंदडा गद्दार; उद्धव ठाकरेंना भेटून त्यांना धडा शिकवू : खा. हेमंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 17:01 IST

खा.हेमंत पाटील यांच्यावर वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा मिरवणुकीत सहभागी झाल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तो मागे घेण्याच्या मागणीसाठी ही बैठक होती.

हिंगोली : शिवसेनेचा २० वर्षे आमदार राहूनही मागच्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा ( Jayprakash Mundada ) यांनी पक्षाशी गद्दारी केली. आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरूनही विरोधकांना हाताशी धरून तेच कित्ता गिरवत आहेत. एवढे दिवस शांत होतो, मात्र आता सहन होत नाही. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thakarey ) यांना भेटून मुंदडा यांना धडा शिकवू, असा इशारा खा. हेमंत पाटील ( MP Hemant Patil ) यांनी आज विश्रामगृहावर आयोजित बैठकीत दिला.

खा.हेमंत पाटील यांच्यावर वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा मिरवणुकीत सहभागी झाल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तो मागे घेण्याच्या मागणीसाठी ही बैठक होती. शिवाय आमदार राजू नवघरे यांनीही खासदारांनी म्हटल्याने पुतळ्याच्या घोड्यावर चढल्याचे वक्तव्य करून दिशाभूल चालविल्याचा आरोपही खा.पाटील यांनी केला. त्यांचा बोलविता धनी आपल्याच पक्षाचा आहे. मात्र मी नवघरे यांना असे म्हटल्याची एक क्लिप दाखविली तर खासदारकीचा राजीनामा देवून राजकारण सोडून देईन, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तर शिवसेनेच्या लोकांना विश्वासात न घेता आम्हीच सर्व काही पाहू, असे सांगून मुंदडा आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही विरोध करीत आहेत. वसमत, जवळा बाजार या सेनेच्या ताब्यातील बाजार समित्या बरखास्त करण्याची मागणी ते कशी करू शकतात? कोणताही अधिकार नसताना पदाधिकारी निवडीचे पत्र लोकांना वाटत फिरत आहेत. ही बाब गंभीर असल्याचेही म्हणाले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी या भागातील शिवसैनिकांचे शिष्टमंडळ नेवू, असेही ते म्हणाले.

यावेळी आ.संतोष बांगर यांनीही मुंदडा यांच्यावर घणाघात चढवत जर पक्षापेक्षा कुणीही मोठा नसल्याचे सांगितले. तर कोणाच्या सांगण्यावरून पुतळ्यावर चढायला राजू नवघरे हे लहान बाळ नाहीत. ते आमदार आहेत. त्यांनी अनावधानाने का होईना केलेला प्रकार चुकीचा आहे. तो मान्य करून जनतेची माफी मागितल्याने विषय संपला होता. मात्र त्याला राजकीय वळण देत असाल तर शिवसेनेने घडल्या प्रकाराचा निषेधच करायला पाहिजे होता. छत्रपती शिवाजी महाराजच शिवसेनेसाठी आण, बाण व शान आहेत. मात्र तरीही या प्रकरणात सेनेने शांततेची भूमिका घेतली होती, असेही ते म्हणाले.

सभेच्या सुरुवातीलाच वसमतमध्ये सुरू असलेल्या राजकीय प्रकाराबाबत तालुकाप्रमुख राजू चापके, जि.प.तील गटनेते अंकुश आहेर यांनी माजी मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा हे कसे जबाबदार ? पटवून दिले. तर प्रल्हाद राखोंडे यांनी आ.राजू नवघरे यांनी चूक मान्य केल्यानंतर विषय संपला होता. मात्र तरीही पुन्हा तेच त्याचे भांडवल करून इतरांनाही ओढण्याचा प्रयत्न करीत असतील तर चुकीचे असल्याचे म्हटले. यावेळी मंचावर जि.प.अध्यक्ष गणाजी बेले, उद्धवराव गायकवाड, राम कदम, डॉ.सतीश शिंदे यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या शिवसैनिकांची उपस्थिती होती. यात बाळासाहेब मगर, भानुदास जाधव, राजेश इंगोले, देवीदास कऱ्हाळे, संदेश देशमुख, नंदकिशोर खिल्लारे, विठ्ठल चौतमल आदींचा समावेश होता.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेHemant Patilहेमंत पाटील