शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

नेत्यांनो, मंत्रालयात जावून आवाज उठवा; गावात येण्याचा प्रयत्न करु नका

By विजय पाटील | Published: October 28, 2023 1:45 PM

महमदपूरवाडी गावात लावले गावबंदीचे फलक; गावकऱ्यांनी घेतला ठराव

हिंगोली: मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत वसमत तालुक्यातील महमदपूरवाडी गावात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी गावात येता कामा नये, असा फलक गावाच्या वेशीवर लावला आहे. पुढारी मंडळींनी गावात न येता मंत्रालयात जावून आवाज उठवावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. तरच गावात प्रवेश करावा. या गावात एकही मराठा समाजाचे कुटुंब राहत नाही. परंतु त्यांची ७० वर्षापासूनची वेदना लक्षात घेऊन या गावातील लिंगायत समाजाने पुढाऱ्यांसाठी गावबंदीचा एकमुखी निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वस्तरामधून आंदोलन उभारण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व गाव एकवटला आहे. या गावात कानडी (लिंगायत) समाजाचे लोक राहत आहे‌त. या गावातील ग्रामस्थांनी एकमताने २७ आक्टोबर रोजी ठराव केला. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून गाव एकवटला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत गावात एकही राजकीय पक्षाच्या नेत्याला प्रवेश मिळणार नसल्याचे गावकऱ्यांनी जाहीर केले आहे. पुढाऱ्यांना गाव बंदी असल्याचे फलक गाव सीमेवर लावले आहेत. महमदपूरवाडी गावाने मराठा बांधवांच्या वेदना जाणून घेतल्या आहेत. ७० वर्षांपासून आरक्षण देवू असे आश्वासन दिले आहे. पण ते पूर्ण केले नाही असे गावकरी सांगत आहेत.

बोराळा ग्रामस्थांचाही निवडणुकांवर बहिष्कार...वसमत तालुक्यातील बोराळा येथेही आरक्षण लढ्याला पाठिंबा आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्ष, पुढाऱ्यांना गावबंदीचा ठराव घेण्यात आला आहे. एवढेच काय सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. येथील श्री संकट मोचन हनुमान मंदिरासमोर समस्त ग्रामस्थांनी एकत्र येत शपथ घेतली आहे. आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात प्रवेश देणार नसल्याचे फलक लावले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षण