शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

जिल्ह्यातील ३० शाळांत १० पेक्षा कमी विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 1:20 AM

सर्वांना सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासन आदेश असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी वेगळे चित्र पहावयास मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात तर ३० शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळांची संख्या कळमनुरी तालुक्यात असून १३ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

रमेश कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : सर्वांना सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासन आदेश असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी वेगळे चित्र पहावयास मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात तर ३० शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळांची संख्या कळमनुरी तालुक्यात असून १३ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शासनाच्या धोरणानुसार सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे बंधनकारक आहे. त्याच बरोबर शाळांसाठीच्या भौतिक सुविधाही उपलब्ध करून देण्याचे शासन आदेश असले तरी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नसल्याचे चित्र कळमनुरी तालुक्यात व जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. शासनाकडे नोंद झालेल्या युडायसनुसार जिल्ह्यात तब्बल ३० शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. अशा सर्वांत जास्त शाळा कळमनुरी तालुक्यात असून, हिंगोली आणि सेनगाव या तालुक्यांमध्ये सर्वांत कमी म्हणजे २-२ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या नोंदवली गेली आहे. हिंगोली तालुक्यातील वसपांगरा या शाळेत विद्यार्थीसंख्या ६ आहे. तर शिक्षक मात्र दोन आहेत. जुमडा येथील शाळेत विद्यार्थी ७ तर शिक्षक २ आहेत. तर सेनगाव तालुक्यातील गोटवाडी व हत्तावाडी या शाळांमध्ये ८ आणि ९ अशी विद्यार्थी तर २-२ शिक्षकांची नियुक्ती आहे. वसमत तालुक्यात खाजमापूर, हनुमान नगर, कारेगाववाडी (कुरूंदा), विकास नगर, दत्तनगर (कुरूंदा), चिंचोली या ६ शाळांचा समावेश आहे. तर कळमनुरी तालुुक्यातील जुनूना वस्ती, पाणवाडी, वस्तीशाळा खडकद खु., एक घरी, रंगनाथवाडी, गणेशवाडी (दांडेगाव), जामगव्हाण तांडा, बेलमंडळ वसाहत, कुंभारवाडी, येहळेगाव गवळी, टाकळगव्हाण, सोनुलेवस्ती रामवाडी, पाणबुडीवस्ती या १३ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहे. तर औंढा तालुक्यातील कामठा, वडद, नागेश दत्तवाडी, सिद्धेश्वर तांडा, देववाडी, नागझरी तांडा, म्हाळसगाव या ७ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहे. या प्रत्येक शाळांमध्ये २-२ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. १० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांची यादीच शिक्षण विभागात चर्चेचा विषय बनली आहे. हिंगोली तालुका २, सेनगाव तालुका २, वसमत तालुका ६, कळमनुरी तालुका १३, औंढा तालुका ७ अशा एकूण ३० शाळांची विद्यार्थीसंख्या १० पेक्षा कमी आहे. हा पट वाढविण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले आहे. हा पट जर चार वर्षे कायम राहीला तर शाळा बंद करण्याबाबतचा निर्णय होवू शकतो. ३ कि.मी. अंतरापर्यंत एक प्राथमिक शाळा असली पाहिजे. या नियमानंतर्गत या शाळा उभारल्या आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीच व गुणवत्तापूर्ण देण्याची सूचना असली तरीही १० पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळेत कोणती गुणवत्ता जोपासली जाते, हा संशोधनाचा विषय आहे.विद्यार्थीसंख्या भरपूर असताना तेथे शिक्षकांची संख्या प्रमाणात नाही. अनेक ठिकाणी ५ वर्ग आणि २ शिक्षक अशी अवस्था आहे; परंतु १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्रत्येकी २ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याकडे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून प्रत्यक्षात खरेच या शाळांमध्ये शिकवणी होते काय? याची तपासणी करायला हवी, असेही शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.एकीकडे विद्यार्थी संख्या भरपूर असतानाही अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. परंतु जिल्ह्यातील या ३० शांळामध्ये मात्र दहा पेक्षा कमी विद्यार्थी असतांनाही प्रत्येक शाळेत मात्र दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमी विद्यार्थी असतांनाही हे शिक्षक तेथे काय काम करतात.याचेवरिष्ठ अधिकाºयांकडून परिक्षण होत नाही त्यामुळे जेथे गरज आहे तेथे शिक्षक नाहीत. अशी विषम परिस्थीती हिंगोली जिल्ह्यात निर्माण झाली आहे. याकडे शिक्षण विभाग कधी लक्ष देणार आहे. विचारणा आता नागरीक करीत आहेत.‘यु डायस’ नुसार आता विद्यार्थी संख्या शासनापर्यंत नियमीत पोहचत असते. त्यांच्या सूविधा व निर्णय हे शासन या संख्येनुसारच पाठवीत असतो. जिल्ह्यात तीस शाळांमध्ये दहा पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे परंतु यासंबंधी काय कारवाई करावी याबाबतचे निर्देष शासनाकडून प्राप्त झालेले नाहीत. असे प्रभारी शिक्षणाधिकारी गणेश शिंदे म्हणाले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी