शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Lok Sabha Election 2019 : निवडणूक कर्मचाऱ्यांचा जेवणावरून गोंधळ, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 12:03 IST

सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

ठळक मुद्देसेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.निवडणुकीच्या कामासाठी गावात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांनी 17 एप्रिलच्या रात्री जेवणाच्या कारणावरुन ग्रामस्थांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रवित्रा घेतला होता.

गोरेगाव (जि. हिंगोली) - सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी निर्णय मागे घेतला आहे.

निवडणुकीच्या कामासाठी गावात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांनी 17 एप्रिलच्या रात्री जेवणाच्या कारणावरुन ग्रामस्थांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रवित्रा घेतला होता. सावखेडा येथे लोकसभा निवडणुकीसाठी चार शिक्षक व एक पोलीस असे एकूण पाच कर्मचारी नियुक्त केले होते. कर्मचारी 17 एप्रिल रोजी साबलखेडा येथे मुक्कामी गेले होते. गावातील रेशन दुकानदार संतोष देवराव भिसे यांनी कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. वरण-भात-भाजी-पोळी असा पाच कर्मचाºयांचा डबा स्वत: नेऊन दिला होता. परंतु मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था झाले नसल्याचे पोलीस ठाण्याला कळवले होते. 

पोलिसांनी सावखेडा येथील समीर भिसे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. सरपंच पती समीर भिसे यांनी संतोष भिसे यांना जेवणाच्या व्यवस्थेबाबत विचारले असता जेवणाचे डबे रात्री 8.30 वाजताच दिल्याचे सांगितले. तसेच आणखी काही अडचण असेल तर चक्कर करून बघतो, असे सांगितले नंतर संतोष भिसे सेवक चीनकुजी खरात, मारुती दत्तराव भिसे सह काही ग्रामस्थ विचारपूस करण्यासाठी गेले असता मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या साध्या जेवणाबाबत नाराजी व्यक्त करीत कोंबडीच्या मटणाची भाजी आणि दारूची व्यवस्था का केली नाही? असे म्हणून नशेत तर्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ केली. त्यानंतर 18 एप्रिल रोजी सकाळी मतदान कक्षात गेलेल्या बुथ एजंटना सुद्धा काय भाजीपाला न्यायला आले काय? तुमच्या गावाचे काय खरे नाही. असे म्हणत कर्मचाऱ्यांनी टोमणे मारले अशी माहिती समीर भिसे यांनी दिली. 

रात्री घडलेल्या सदर प्रकारामुळे सावरखेडा येथील ग्रामस्थांनी सकाळी मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मतदान न करण्याचा पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार टाकला होता. याची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सुधाकर आढे, सेनगावचे नायब तहसीलदार भोजने यांना मिळताच त्यांनी मतदान केंद्राला भेट दिली. ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच तक्रार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास गोरेगाव येथे पाठवून दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला साबलखेडा येथे नियुक्त केले. तसेच लेखी तक्रार करा यानंतर निवडणूक आयोग कर्मचाऱ्यावर कारवाई करील असे सांगून ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर तब्बल सव्वा दोन तासानंतर 9.15 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhingoli-pcहिंगोलीPoliceपोलिसVotingमतदान