शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

महाआघाडीला विधानसभेत जमले, ग्रामपंचायतीत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:22 AM

हिंगोली : राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रितपणे महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेत आली आहे. मात्र, ग्रामपंचायत ...

हिंगोली : राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रितपणे महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेत आली आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व पक्षांचे कार्यकर्ते अजूनही आपला वेगळा झेंडा घेऊन फिरत असल्याने महाविकास आघाडी कुठेच दिसत नाही. शेवटी पुढाऱ्यांनाही कार्यकर्त्यांच्या इच्छा, आकांक्षांच्या पुढे जाता येत नसल्याने नाइलाजाने त्यांच्या कलाने घ्यावे लागते.

हिंगोली जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध निघाली. ही संख्या ७४ वर आहे. याशिवाय काही ठिकाणी तर एक दोन जागांसाठीच निवडणूक होत आहे. बिनविरोधसाठी अडचणी आणण्यापेक्षा गावात आमच्याही पक्षाचे प्राबल्य आहे, हे सिद्ध करण्याचा खटाटोप लक्षात घेता कार्यकर्त्यांमध्ये झुंज रंगली आहे. अनेक पुढाऱ्यांनी गाव पातळीवर सलोख्यासाठी एकत्रित येऊन बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले होत. मात्र, कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीतूनच पुढच्या जि.प. व पं.स.चा प्रवास सुकर करण्याची संधी असते. त्यामुळे अनेक जण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणे अथवा आपल्या गटाचे पॅनल उभे करतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या, तरीही पक्षीय कार्यकर्तेच पॅनलच्या माध्यमातून आपापले वर्चस्व सिद्ध करतात. कुठे काँग्रेस तर कुठे सेना वरचढ आहे. कुठे राष्ट्रवादी तर कुठे भाजप वरचढ आहे. सध्या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्येही विविध पक्ष आपापल्या गटाच्या कोणत्या ग्रामपंचायती आहेत, याचे दावे करीत आहेत. मात्र, जेथे निवडणुका होत आहेत, तेथेही अनेक ठिकाणी आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारावी, यासाठी नेतेमंडळी मार्गदर्शन करताना दितस आहे.

कार्यकर्त्यांमुळे नेते व नेत्यांमुळे कार्यकर्ते निवडणूक रिंगणात

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असली तरीही शिवसेनेशी नव्हती. आता राज्यात आघाडी असली तरीही गावपातळीवर विधानसभेतील लढतीच्या वचप्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या वचप्याच्या नादात मित्रपक्षच एकमेकांविरुद्ध उभे असल्याचे चित्र अनेक गावांत आहे. त्यात कुठे नेते तर कुठे कार्यकर्ते जोर लावताना दिसत आहेत.

गाव पातळीवरील निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण नसते. मात्र, पक्षीय कार्यकर्तेच लढतात. त्यात गावनिहाय वेगळी स्थिती असते. त्यामुळे आघाडी करणे शक्य नसते. काँग्रेसच्या ताब्यातही अनेक ग्रामपंचायती आल्या निवडणुकीनंतर आम्हीच सरस असल्याचे दिसून येईल.

- संजय बोंढारे,

जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

ग्रामपंचायत निवडणूक ही गावपातळीवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देणारी निवडणूक आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनेक गावांत निवडणूक लढत आहेत. आघाडी केल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. त्यामुळे त्यांच्यावरच निर्णय सोपवून जास्तीत जास्त ग्रा.पं. ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे.

- दिलीप चव्हाण,

जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेनेने बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व सिद्ध केले. गाव तेथे शाखा व शिवसैनिकांचे जाळे आहे. त्यामुळे राज्यात आघाडी असली तरीही गावात ती शक्य नाही. तर पक्षाकडूनही तसे काही धोरण नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी लढत देत बाजी मारू.

- आ. संतोष बांगर,

जिल्हाप्रमुख, शिवसेना

निकालानंतरही अडचणच

अनेक ठिकाणी मित्रपक्षांतच लढती होत आहेत. काही भागांतच भाजपशी लढा होत असल्याने काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीत निवडणुकीनंतरही अनेक गावांत सलगीची चिन्हे दिसत नाहीत. काही ठिकाणी तर मित्रपक्षातील काही कार्यकर्ते भाजपच्या सोबत पॅनलमध्ये असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे गावपातळीवर आघाडी, बिघाडीचा काहीच संबंध नसल्याचेच चित्र अनेक ठिकाणी आहे.