शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

'वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा'; भर पावसात शेतकऱ्यांचा विभागीय वनअधिकारी कार्यालयावर मोर्चा

By रमेश वाबळे | Published: July 21, 2023 6:37 PM

बहुतांश भागात वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांवर वन्य प्राणी हल्ला करीत आहेत.

हिंगोली : वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने पिकांची नासाडी होत असून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, पिकांच्या संरक्षणासाठी तार कुंपन उपलब्ध करून द्यावे, या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय वन अधिकारी कार्यालयावर २१ जुलै रोजी स्वाभिमानी शेती बचाओ एल्गार मोर्चा काढण्यात आला. भर पावसात हजारो शेतकरी मोर्चात सहभागी होते. 

जिल्ह्यातील बहुतांश भागात वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांवर वन्य प्राणी हल्ला करीत आहेत. शेतकरी व पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना तारकुंपन, सौर उर्जा कुंपन उपलब्ध करून द्यावे, या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश पाटील गोरेगावकर, गजानन कावरखे, दामूअण्णा इंगोले, नामदेव पतंगे, गोविंद भवर आदींच्या उपस्थितीत शुक्रवारी विभागीय वन अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा इंदिरा चौक, नांदेड नाका, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे रेल्वे उड्डाणपुलावरून विभागीय वन अधिकारी कार्यालयावर धडकला. रिमझिम पावसातही हजारो शेतकरी सहभागी झाले होते. वन अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वन अधिकाऱ्यासोबत चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

तगडा पोलिस बंदोबस्तयावेळी पोलिस प्रशासनच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रूग्ण वाहिका, अग्निशमन बंब यासह ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 

तार कुंपन मिळालेच पाहिजे...मोर्चात सहभागी पदाधिकारी, शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी तारकुंपन मिळावे,  शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो आदी घोषणा सहभागी मोर्चेकऱ्यांकडून देण्यात येत होत्या.

टॅग्स :forestजंगलFarmerशेतकरीHingoliहिंगोली