शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

तरुणाच्या त्रासामुळे विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:47 IST

दिसायला खूप सुंदर आहेस, माझ्याशी संबंध ठेव, आपण पळून जाऊन लग्न करू’, असे म्हणून दीड ते दोन वर्षांपासून गावातीलच तरुणाने त्रास दिला. त्याला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची पतीने तक्रार दिल्याने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : ‘तू दिसायला खूप सुंदर आहेस, माझ्याशी संबंध ठेव, आपण पळून जाऊन लग्न करू’, असे म्हणून दीड ते दोन वर्षांपासून गावातीलच तरुणाने त्रास दिला. त्याला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची पतीने तक्रार दिल्याने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील मौजे साळवा येथील विवाहिता वैशाली संतोष करंडे (२५) हिने आपल्या राहत्या घरी २८ जुलै रोजी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तिला एक चार वर्षांचा मुलगा व पाच महिन्यांची मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. याप्रकरणी प्रारंभी बाळापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती; परंतु २ आॅगस्ट रोजी सदर महिलेचा पती संतोष दाजीबा करंडे याने ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, गावातील बापूराव उर्फ सोनू अशोक करंडे हा एक ते दीड वर्षांपासून माझ्या पत्नीला त्रास देत होता, तू दिसायला खूप सुंदर आहेस, माझ्याशी संबंध ठेव, आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, असे म्हणून तो तिला छळत असे. त्याचा छळ असह्य झाल्याने सदर विवाहितेने ही बाब पती संतोष यांना सांगितली. संतोषने सोनू करंडे याला त्याच्या घरी जाऊन समज दिली. माझ्या पत्नीला छळू नकोस, असेही सांगितले. असे दोन ते तीन वेळा सांगूनही सोनूच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. मात्र या मनस्तापातून वैशालीने २८ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली .या घटनेपूर्वी बापूराव करंडे, सुरेखा करंडे, लक्ष्मीबाई मोरे यांनी वैशालीच्या घरी जाऊन तिच्याशी वाद घातला होता. तर 'तुझ्यामुळे आमची बदनामी होत आहे, तूच वागायला बरोबर नाहीस, तुझी एखाद्या दिवशी गाढवावरून धिंड काढते 'असे म्हणून मारहाणही केली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणी संतोष यांच्या फिर्यादीवरून बापूराव उर्फ सोनू अशोक करंडे, सुरेखा करंडे, लक्ष्मीबाई मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

 

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrimeगुन्हा