शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

घरांना आग लागल्याने लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:49 IST

हिंगोली तालुक्यातील जयपूर वाडी गावातील दोन घरांना आग लागल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. गावात पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील जयपूर वाडी गावातील दोन घरांना आग लागल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. गावात पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.जयपूरवाडी येथील श्रीराम कºहाळे यांच्या लाकडी माळवदाच्या घराला आग लागली. घरातील देवाच्या देव्हाऱ्यातील दिव्याने लाकडाच्या खांबाला आग लागल्याचा अंदाज आहे. त्यानंतर आगीने उग्र रुप धारण केल्याने पाहता पाहता शेजारील नागोजी सूर्याजी गाढे यांच्याही घराला आग लागली. या आगीत श्रीराम कºहाळे यांचे माळवदाचे घर कोसळल्याने घरातील सर्व साहित्य माळवदाखाली दबले गेले. त्यात कºहाळे यांचे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले आहे. तर नागोजी सूर्याजी गाढे यांचे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आग विझविण्यासाठी सर्व गाव एकवटले होते. मात्र गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणी उपलब्ध नव्हते. ग्रामस्थांनी दोन कि.मी. अंतरावरुन पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी १ वाजता दाखल झाले. अग्निशमन दलाचे पथक येण्यापूर्वीच ग्रामस्थांनी आग विझवली होती. येथील परिसरात यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जयपूर वाडीमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही तर, आग विझवण्यासाठी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. याही परिस्थितीत आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.शॉटसर्किटमुळे आखाडा जळून खाक४शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील भवानीच्या माळाजवळील शेतात ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान शॉटसर्किटमुळे पेट घेऊन आखाड्यातील विविध शेतीपयोगी औजारे जळून खाक झाली आहेत. कुठलीही जीवित हानी झाली नाही. शिरडशहापूर येथील गट. क्र. ५३५ मधील चंद्रहार लक्ष्मण वाहटळे यांच्या शेतातील आखाड्याजवळील विजेच्या तारांचे घर्षण होऊन धुऱ्यावरील गवताने पेट घेतला. पाहता पाहता सर्वत्र आग लागली. यात आखाड्याने पेट घेतला. आखाड्यातील विविध शेती औजारे, ठिबक संच, पाईप इ. साहित्य जळून खाक झाले असून जवळपास एक लाख रुपयांच्या वर नुकसान झाले आहे.