शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
2
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
3
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
4
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
5
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
6
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
7
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
8
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
9
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
10
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
11
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
12
डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
13
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
14
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
15
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
16
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
17
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला
18
Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे
19
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
20
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल

पीककर्ज वाटप होत नसल्याने खासदारांनी बाेलावली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:30 AM

आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये गतवर्षी ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त पीक कर्जवाटप झाले असताना हिंगोलीत मात्र ५० टक्के वाटप झाले. यंदा १०० टक्के ...

आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये गतवर्षी ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त पीक कर्जवाटप झाले असताना हिंगोलीत मात्र ५० टक्के वाटप झाले. यंदा १०० टक्के पीककर्ज वाटप न झाल्यास रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे तक्रार करण्याचा इशारा खा. पाटील यांनी दिला. पीक कर्ज वाटपात सध्या इतर जिल्ह्यांमध्ये बँकांनी आघाडी घेतली असताना हिंगोली जिल्ह्यात बँका कागदी घोडे नाचविण्यात दंग आहेत. या पार्श्वभूमीवर खा. पाटील यांनी मंगळवारी जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली. तसेच सध्या किती पीक कर्ज वाटप झाले, याचा आढावा घेतला. एक दिवसआड बँकांमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुभा दिली आहे. मात्र, बँका शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर सेनगाव, गोरेगाव येथील बँकांबाबत गंभीर तक्रारी असल्याचे पाटील यांनी सांगितले. याठिकाणी दलालांमार्फत गेल्याशिवाय शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत २९ मे रोजी बँकांची बैठकही आयोजित करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसे निवेदनही दिले. त्याचबरोबर सध्या एक दिवस दिलेला असल्याने त्यादिवशी दोन सत्रांमध्ये पीक कर्जाचे प्रस्ताव तयार करून घेण्यास अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सावंत यांना सांगितले. यावेळी महसूल व इतर यंत्रणांची मदत घेण्यासही सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उद्धव गायकवाड, शिवसेना समन्वयक दिलीप बांगर, डॉ. रमेश शिंदे आदींची उपस्थिती होती.