शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
2
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
3
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
4
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
5
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
6
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
7
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
8
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम
9
“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील
10
केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
11
"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"
12
IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
14
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
15
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
16
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
17
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
18
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
19
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
20
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

खरीपातील भरपाईचा पत्ता नाही; रबीसाठी पीकविम्याकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 1:51 PM

हिंगोली जिल्ह्यात यंदा रबीच्या ७२ टक्के पेरण्या आटोपल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

ठळक मुद्दे१५ डिसेंबर ही विमा काढण्याची अंतिम मुदत आहे. यंदा अवघ्या सहा हजार शेतकऱ्यांनी विमा काढला.

हिंगोली : जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही अनेकांना अजून विमा मिळाला नाही. अर्ज फाटे करूनही काहीच फायदा होत नसल्याची भावना शेतकऱ्यांची झाल्याने रबी हंगामासाठी विमा काढण्याकडे फारसा कल दिसत नाही. यंदा अवघ्या ६०७० शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा काढला आहे. 

हिंगोली जिल्ह्यात यंदा रबीच्या ७२ टक्के पेरण्या आटोपल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात अजूनही वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत शेतकरी पीक विमा काढताना दिसत नाहीत. १५ डिसेंबर ही विमा काढण्याची अंतिम मुदत आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांची यासाठी लगबग दिसत नाही. दुसरीकडे विमा कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरिपातील नुकसानीच्या पीक कापणी प्रयोगानुसारच्या व प्रत्यक्ष पाहणीतील अहवालानुसार विम्याच्या वाटपासाठी काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांना अजूनही विमा मिळेल, याचा विश्वास दिसत नसल्याने शेतकरी विमा काढण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा अवघ्या सहा हजार शेतकऱ्यांनी विमा काढला.

खरीप नुकसानीचे अनुदानहिंगोली जिल्ह्याला खरीप नुकसानीच्या अनुदानाचा पहिला टप्पा ११२ कोटी रुपयांचा प्राप्त झाला आहे. शासनाने दिलेल्या या रकमेचे वितरण करण्यासाठी हा हप्ता तालुका स्तरावर जिल्हा प्रशासनाने वितरितही केला आहे. आता हळूहळू इतर कामांतून वेळ मिळत असल्याने महसूलचे अधिकारी व कर्मचारी या अनुदानाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया करीत आहेत. मात्र त्याची गती मंद असल्याचे दिसत आहे.

विमा नशिबाचाच खेळमी पूर्वी पीक विमा काढायचो . मात्र नुकसान झाल्यावर मिळत नाही. नाही झाले तरीही मिळते, असे दिसले. हा नशिबाचाच खेळ झाला. वस्तुनिष्ठता नाही. हे असेच दरवर्षी घडते. त्यामुळे यंदा साडेपाच एकर गहू व टाळकी असूनही पीक विमा काढला नाही.  त्यावर फारसा विश्वासच राहिला नाही. - सदाशिव तारे, सवड

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCrop Loanपीक कर्ज